घरमुंबई'अंबरनाथ आणि बदलापूर प्रदूषणास नगरपालिका आणि एमआयडीसी जबाबदार'

‘अंबरनाथ आणि बदलापूर प्रदूषणास नगरपालिका आणि एमआयडीसी जबाबदार’

Subscribe

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव ई. रविंद्र यांनी अंबरनाथ आणि बदलापूर प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्याही उपयोजना केल्या नाहीत असा आरोप केला आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर येथे होणाऱ्या जल व वायू प्रदूषणास तेथील नगरपालिका आणि एमआयडीसी जबाबदार आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी संबंधितांनी कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे दिसून येत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव ई. रवींद्रन यांनी केला आहे. अंबरनाथ येथे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने एस ३ या हॉटेलमध्ये बुधवारी दुपारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ई. रवींद्रन यांनी हा आरोप केला.

१७.५ किमीची पाईपलाईन टाकण्याचा प्रस्ताव

ते पुढे म्हणाले की, येथील कारखानदारांनी सीईपीटी प्लांट बसवणे आवश्यक असून त्याबाबत वारंवार सूचना देऊन देखील कारखानदार त्या सूचनेचा पालन करीत नाहीत. अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकांना सांडपाण्यावर प्रक्रिया करून (एसटीपी प्लांट) सुरू करण्याची अनेकदा ताकीद दिली आहे. मात्र हे प्लांट बंद असल्याने हे सांडपाणी वालधुनी नदीत मिसळते. या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते सांडपाणी फॉरेस्ट नाका ते कल्याण खाडी या १७.५ किमीची पाईपलाईन टाकण्याचा प्रस्ताव आता विचाराधीन आहे.

- Advertisement -

अंबरनाथ नगरपालिकेद्वारे दररोज ६५ एमएलडी सांडपाणी वालधुनी नदीत सोडले जाते. तर आनंदनगर एमआयडीसी परिसरातून केवळ ३.५ सांडपाणी सोडले जाते. सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाईपलाईनद्वारा कल्याण खाडीत ते पाणी सोडण्याची परवानगी आम्ही मागितली आहे. मात्र हे प्रकरण अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित आहे. – उमेश तायडे (आमा कारखानदार संघटना अध्यक्ष) 

अंबरनाथ नगरपालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी वडोल गाव आणि चिखलेली येथे एसटीपी प्लांट बनविलेले आहेत. ते सुरळीतपणे सुरू आहेत. २८ एमएलडी सांडपाणी दररोज प्रक्रिया करून सोडले जाते. सर्वोच्च न्यायालयात प्रदूषणाबाबत आम्ही बाजू मांडतांना प्रतिज्ञापत्र सादर करून माहिती दिली आहे. जे सांडपाणी वालधुनी नदीत जात आहे. ते उल्हासनगर महानगरपालिकेचे असून त्यांचा देखील स्वतःचा एसटीपी प्लांट वडोल गाव येथे तयार होत आहे. – राजेंद्र हवळ (पाणीपुरवठा अभियंता, अंबरनाथ नगरपालिका)

- Advertisement -

हेही वाचा – दुर्गाडी पुलाच्या पूर्णत्वाच्या कामाला २०२० चा मुहूर्त!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -