घरताज्या घडामोडी'समाजात बटवारा करण्याचे काम भाजप सरकार करत आहे'

‘समाजात बटवारा करण्याचे काम भाजप सरकार करत आहे’

Subscribe

‘समाजात बटवारा करण्याचे काम भाजप सरकार करत आहे. या सरकारच्या हातात पुन्हा सत्ता देणं चुकीचं आहे त्यामुळे यावर आपल्याला विचार करावा लागणार आहे’, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. अल्पसंख्याक सेलची बैठक आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्यालयात पार पडली. ‘अल्पसंख्याक समाजाची समस्या आहे. या समाजाच्या समस्या सोडवायच्या आहेत. सध्या देशात भाजपाची सत्ता आहे. समाजातील सर्व वर्गाला सोबत घेऊन जायचं असतं ही सरकारच्या नेतृत्वाची जबाबदारी असते. भारतातील सर्व लोकांना अधिकार आहे परंतु त्यांच्या मनात शंका निर्माण केली जात आहे’, असा आरोपही शरद पवार यांनी केला.

अल्पसंख्याक समाजातील लोकांना भारतात परत यायचं आहे

पाकिस्तान, बांग्लादेश आणि श्रीलंकेचा काही भागांमध्ये भारतातील काही लोक राहतात. त्यांना भारतात परत येण्याची इच्छा आहे आणि त्यांचा तो अधिकार आहे, परंतु ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांना ते मान्य नसल्याचेही शरद पवार म्हणाले. पुढे ते म्हणाले की, अल्पसंख्याक समाजातील लोकं मोठ्या प्रमाणावर भारतातून बाहेर गेली होती त्यांना देश स्वतंत्र झाल्यावर परत यायचं आहे.

- Advertisement -

एनआरसी आणि सीएएबाबत शरद पवारांनी केला आरोप 

‘एनआरसी, सीएए यामुळे मुस्लिम समाजाला नजर अंदाज केलं जात आहे. तर दुसरीकडे व्हिजेएनटीचे जे लोक आहेत ते कामानिमित्त एका जाग्यावर राहात नाही. अशा लोकांचे रेकॉर्ड मिळत नाही. त्यामुळे त्यांनाही सांगावं लागणार आहे. त्यांचा पुरावा द्यावा लागणार आहे ही वेळ या भाजपाने आणली आहे’, असा आरोपही शरद पवार यांनी केला. ‘काही लोक श्रीलंकेमध्ये जन्मलेले आहेत त्यांनाही भारतात यायचं आहे. परंतु आजच्या सरकारने जो कायदा केला आहे त्यांनी या सर्व गोष्टींचा विचार केलेला नाही. अल्पसंख्याक विभाग आमच्याकडेच हवा असे मला सांगण्यात आले होते. त्यानुसार नवाब मलिक यांच्यावर या खात्याची जबाबदारी दिली आहे त्यामुळे ते अल्पसंख्याक समाजासाठी काम करतील’, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, खासदार माजिद मेमन, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक आदींसह पक्षाचे इतर नेते उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – अमित ठाकरेची राजकारणात एन्ट्री, मनसेच्या नेतेपदी निवड


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -