घरमुंबईन्याय व्यवस्था सक्षम करण्याची गरज

न्याय व्यवस्था सक्षम करण्याची गरज

Subscribe

विधि महाविद्यालयाचा नामांकरण सोहळा संपन्न होत असताना देशातील व राज्यातील न्याय व्यवस्था सक्षम करण्याची काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

राजगुरुनगर येथील विधी महाविद्यालयाच्या 13 व्या वर्धापन दिनानिमित्त सरसेनापती हंबीरराव मोहिते नामकरण सोहळा संपन्न झाला. जयंत पाटील, माजी आमदार दिलीप मोहिते, माजी विधानसभा सभापती रामराजे निंबाळकर, प्राचार्य शिवाजीराव मोहिते, सुरेखा मोहिते आणि राष्ट्रवादी पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

राज्यात येणार्‍या निवडणुकींचा सामना तलवारीने नाही तर बुद्धीने करायला पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा. राज्यात आपलेच सरकार येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

देशाच्या न्यायव्यवस्थेत सुप्रीम कोर्टापासून ते तालुका कोर्टापर्यत लाखो केसेस पडुन आहेत. त्यांचे निकाल वर्षानुवर्षें लागलेले नाहीत. नागरिकांना कोर्टाच्या पायर्‍या झिजवाव्या लागतात. त्यामुळे आपल्या देशातील लोकांना लवकरात लवकर न्याय मिळण्याची व्यवस्था करण्याची पुढील काळातील गरज असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -