घरताज्या घडामोडीअनिल देशमुखांविरोधात धाडस दाखवणाऱ्या, कोण आहेत Adv जयश्री पाटील ?

अनिल देशमुखांविरोधात धाडस दाखवणाऱ्या, कोण आहेत Adv जयश्री पाटील ?

Subscribe

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर अॅड जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर १०० कोटी रूपये वसुलीचा आरोप केला होता. याच प्रकरणात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेत सेंट्रल ब्युरो ऑफ इनवेस्टीगेशन (सीबीआय) ने चौकशी करावी, अशी मागणी अॅड जयश्री पाटील यांनी रिट केली होती. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश देतानाच संपुर्ण प्रकरणात १५ दिवसांचा अहवाल सादर करण्याचेही स्पष्ट केले आहे. अनिल देशमुख्य गृहमंत्री असल्याने त्यांच्या अखत्यारीत महाराष्ट्र पोलिस आहेत, म्हणूनच या प्रकरणाची चौकशी योग्य प्रकारे होऊ शकत नाही. उच्च न्यायालयाने दिलेल्यी सीबीआय चौकशीमुळे आज मी खूप खूष आहे, असे अॅड जयश्री पाटील म्हणाल्या. या प्रकरणात जयश्री पाटील यांनाही बोलावण्यात येणार आहे. अनिल देशमुख तुम्ही कितीही दबाव आणला तरीही कायद्यापेक्षा आणि संविधानापेक्षा तुम्ही मोठे नाहीत, अशी प्रतिक्रिया अॅड जयश्री पाटील यांनी दिली आहे. मला हेच सांगायच आहे, की अनिल देशमुख ही मोघलाई नाही, तुम्ही कुणाला धमकावू शकत नाही, मी भारतमातेची बेटी, स्वातंत्र्यसैनिकाची मुलगी आहे.

एका शूर आहे, ज्याने हिंमत दाखवली

मुंबई उच्च न्यायालायने अॅड जयश्री पाटील यांची याचिका दाखल करून घेताना म्हटले की, या प्रकरणात डायरेक्टर जनरल सीबीआय या प्रकरणात चौकशी करतील. त्याचवेळी कोर्टाकडून अॅड जयश्री पाटील यांचे कौतुकही केले. कोणीतरी एक शूर आहे ज्याने हिंमत दाखवली अशा शब्दात हायकोर्टाने त्यांचे कौतुक केले. एवढ्या १०० कोटींच्या प्रकरणात एक तरी शूर आहे जे समोर आले आहेत, असे मत कोर्टाने यावेळी व्यक्त केले.

- Advertisement -

कोण आहेत अॅड जयश्री पाटील ?

मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका जी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे, त्या याचिकाकर्त्यांपैकी एक म्हणजे अॅड जयश्री पाटील होय. अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच्या मराठा आरक्षणविरोधातील याचिकाकर्त्या म्हणून त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात आहे. जयश्री पाटील यांनीही सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला विरोध जाहीर केला आहे. याआधी जयश्री पाटील यांनी राज्य सरकारच्या मानव हक्क आयोगाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणून सात वर्षे जबाबदारी सांभाळली आहे. तसेच मानव अधिकारांबाबत त्यांच्या नावे अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. जयश्री पाटील या जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. एल. के. पाटील यांच्या कन्या आहेत. परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी म्हणून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

जयश्री पाटील यांची कायदा विषयात डॉक्टरेट झाली आहे. गेल्या २२ वर्षापासून त्या मुंबई उच्च न्यायालयात अॅडवोकेट म्हणून कार्यरत आहेत. अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या त्या पत्नी होत. अॅड जयश्री पाटील आणि अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी मिळूनच मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -