“पुढच्या काही दिवसांमध्ये देशात राम मंदिरच्या मुद्दयांवर दंगली घडविण्यासाठी ओवेसी सारख्या लोकांबरोबर बोलणी सुरु आहेत. कारण या नाकर्त्या सरकारला हिंदू-मुस्लिम दंग्यांवर निवडणूक लढवायची आहे.”, असा घणाघाती आरोप राज ठाकरे यांनी विक्रोळी येथील आयोजित केलेल्या महोत्सवात केला आहे. सरकारकडे दाखवण्यासाठी काहीही राहिलेले नाही. त्यामुळे हिंदू-मुस्लिम दंगली घडवण्याकडे यांचा कल दिसत आहे. राम मंदिर व्हायला पाहीजे का? तर नक्कीच झाले पाहीजे. पण ते निवडणुकीनंतर. पण राम मंदिराचा वापर लोकांच्या भावना भडकवण्यासाठी केला जात असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले.
आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही जोरदार टीका केली. “हनुमान दलित होता, याचा साक्षात्कार योगी आदित्यनाथांना आताच कसा झाला? याआधी राम किंवा हनुमानाची जात कुणीही काढली नव्हती किंवा तसा विचारही केला नव्हता. योगी आदित्यनाथ ओवेसी बद्दल जे काही बोलले ते दंगलीची सुरुवात आहे. लोकांनी आता सतर्क राहण्याची गरज आहे.”, असा इशारा ठाकरे यांनी दिला.
“देशात सध्या जे राजकारण सुरु आहे, त्यावरून लोकांनीच सतर्क व्हायला हवे. हा देश आणि राज्य प्रगतीपथावर नेण्यासाठी लोकांनीच काळजी घेऊन कुणाच्याही भडकाऊ वक्तव्यावर विश्वास ठेवू नये. तसेच पोलिसांनीही सतर्क राहून अशा लोकांवर कारवाई केली पाहीजे. तरिही कुणी वेडं-वाकडं करण्याचा प्रयत्न केला तर मी आहेच.”, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.
#राजठाकरे #विक्रोळीमहोत्सव
महाराष्ट्रात आणि देशात वाढलेली बेरोजगारी हे महत्त्वाचे प्रश्न आहेत परंतु देशाचं राजकारणाला भलत्याच विषयांनी कलाटणी देण्याचा कट आखला जातोय. ज्यामुळे मूळ प्रश्न बाजूला व्हावेत आणि लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळून पुन्हा सत्तेत यावे हा उद्देश आहे.— MNS Adhikrut (@mnsadhikrut) December 3, 2018
#राजठाकरे #विक्रोळीमहोत्सव
आज मला दिल्लीवरून समजलेली बातमी अतिशय गंभीर आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये ह्या देशात राम मंदिरच्या मुद्दयांवर दंगली घडविण्यासाठी ओवेसी सारख्या लोकांबरोबर बोलणी सुरु आहेत.
कारण ह्या नाकर्त्या सरकारला हिंदू-मुस्लिम दंग्यांवर निवडणूक लढवायची आहे.— MNS Adhikrut (@mnsadhikrut) December 3, 2018
#राजठाकरे #विक्रोळीमहोत्सव
मी गुढीपाडव्याच्या सभेत म्हटलं होतं कि, राममंदिर व्हायला पाहिजे का ? तर निश्चित व्हायला पाहिजे पण २०१९च्या निवडणुकीनंतर. परंतु हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण करायचं आणि मतं मागायची हा एककलमी कार्यक्रम आता ह्या सरकारचा असणार, तेव्हा सतर्क राहा.— MNS Adhikrut (@mnsadhikrut) December 3, 2018
#राजठाकरे #विक्रोळीमहोत्सव
योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यापासून एकदाही त्यांनी राज्याच्या विकासावर विधानं केलं नाही. आजपर्यंत आपण कधी रामाची-हनुमानाची ह्यांची जात विचारली होती का? फक्त जाती-धर्मांमध्ये फक्त आगी लावायचे उद्योग सुरु असतात त्यांचे.— MNS Adhikrut (@mnsadhikrut) December 3, 2018