घरमुंबईलाठीचा वापर करण्याची वेळ आणू नका!

लाठीचा वापर करण्याची वेळ आणू नका!

Subscribe

पोलीस विनाकारण त्रास देणार नाहीत; जिल्हांतर्गत प्रवासासाठी पासची गरज नाही

राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. तर कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आपण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे जनतेने सहकार्य करावे. पोलीस कुणालाही विनाकारण त्रास देणार नाही याची हमी देतो; पण जाणूनबुजून संचारबंदीचा भंग करून आम्हाला लाठीचा वापर करण्याची वेळ आणू नका, असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी केले. राज्यात 144 कलम लागू होत आहे. मात्र जिल्हातंर्गत प्रवासावर बंदी घातलेली नाही. त्यासाठी पासची गरज नाही.

तसेच 5 पेक्षा जास्त लोकांनी घराबाहेर पडू नये. जर खरोखर काम असेल आणि कोणी बाहेर पडले असेल तर हरकत नाही. जाणूनबुजून नियमभंग केला नसेल तर पोलीस विनाकारण फटकवणार नाहीत. मात्र, जाणूनबुजून नियमांचा भंग करून आमच्यावर लाठी वापरण्याची वेळ आणून नका, असे पांडे म्हणाले.राज्यात संचारबंदी लागू होण्यासाठी अवघे काही तास उरलेले असतानाच पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आवाहन केले.

- Advertisement -

…तर बळाचा वापर करू
जोपर्यंत कुणी जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन करत नसेल तर पोलीस लाठीचा वापर करणार नाहीत. त्यामुळे अति उत्साहीपणा दाखवू नका. आम्हाला कारवाई करायची नाही. ती वेळ तुम्ही येऊ देऊ नका. पण कुठे तरी जाळपोळ, पब्लिक प्रॉपर्टी नासधूस होत असेल तर आम्ही काहीच करणार नाही असा याचा अर्थ नाही. असे काही चित्र दिसले तर नाईलाजाने आम्हाला बळाचा वापर करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा. अन्यथा पडू नका, असेही ते म्हणाले.

15 दिवसात आकडे कमी होतील
सध्याची परिस्थिती कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळा. पोलीस आपल्यासोबत उभे आहेतच. सरकारच्या आदेशाचे पालन करा. मोठ्या देशांनी लॉकडाऊन केलेय. आपल्याला ते नवे नाही. आपणही नियमांचे काटेकोर पालन केले तर येत्या 15 दिवसात कोरोनाचे आकडे कमी होतील, असा दावाही त्यांनी केला.

- Advertisement -

आमच्याकडे पॉवर, पण सहकार्य करा
पोलिसांकडे पॉवर आहे, अ‍ॅक्ट आहेत, आम्ही त्याचा कमीत कमी वापर करू. मात्र, लोकांनी सहकार्य केले नाही तर कारवाई निश्चित होणार, त्यात वाद नाही. आम्हाला कारवाई करायची नाहीय. विनाकारण कारवाई करायची नाही याची हमी देतो. पण तुम्हीही कायद्याचा आदर करा. सहकार्य करा, असे आवाहनही त्यांनी केले.

…तर पासची गरज नाही
अत्यावश्यक काम असेल तर पासशिवाय तुम्ही बाहेर पडू शकता. पण कारण नसताना बाहेर पडल्यास कारवाई होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -