घरमुंबईराहुल गांधींनी देशातील जनतेची माफी मागावी - चंद्रकांत पाटील

राहुल गांधींनी देशातील जनतेची माफी मागावी – चंद्रकांत पाटील

Subscribe

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राफेल खरेदी प्रकरणातून खोटे आरोप करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी देशातील जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केली.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राफेल खरेदी प्रकरणातून खोटे आरोप करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जनतेला सत्य कळले आहे. केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी केली. त्यामुळे त्यांनी देशातील जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केली आहे. आज, शनिवारी राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

- Advertisement -

राफेल प्रकरणीच्या सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार याचिका फेटाळून लावत, राहुल गांधींना माफी मागायला लावली. यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने राहुल गांधींनी देशवासियांची दिशाभूल करणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी केल्याबद्दल संपूर्ण देशभर आंदोलन करण्यात येत आहे. याअंतर्गत दादर येथील वसंत स्मृती येथे महाराष्ट्र भाजपाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते सहभागी होऊन, त्यांनी राहुल गांधींविरोधात तीव्र घोषणाबाजी केली.

राफेलप्रकरणी राहुल गांधींनी देशाची माफी मागावी,भाजप नेत्यांची मागणी

राफेलप्रकरणी राहुल गांधींनी देशाची माफी मागावी,भाजप नेत्यांची मागणी

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ನವೆಂಬರ್ 15, 2019

- Advertisement -

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की,

स्वत:च्या स्वार्थासाठी एखादा व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकतो हे संपूर्ण देश पाहात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत राफेल प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोटे आरोप करुन जनतेची दिशाभूल केली. या सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे दूध का दूध पानी का पानी होऊन, जनतेला खरं काय समजलं आहे. राहुल गांधींनी देशवासियांची दिशाभूल केल्यामुळे देशातल्या जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे.

मुंबई भाजपचे महामंत्री सुनिल राणे, माजी मंत्री योगेश सागर, महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी, राज पुरोहित, प्रवक्ते अतुल शहा यांच्या सह मुंबई महापालिकेतील भाजप नगरसेवक आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा –

चंद्रपूर, नाशिकमधील भाजप नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवले?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -