घरमुंबईशिवसेनेला दिलासा, शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी साईनाथ दुर्गे जेल बाहेर

शिवसेनेला दिलासा, शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी साईनाथ दुर्गे जेल बाहेर

Subscribe

मुंबई : शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी ठाकरे गटाच्या युवासेनेच्या साईनाथ दुर्गे यांच्यासह सहा जणांना अटक केली होती. या सातही जणांना गुरुवारी (२३ मार्च) न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आज दहा दिवसांनी हे सर्व संशयित जेल बाहेर आले आहेत. साईनाथ दुर्गे हे ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत.

शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा कथित व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी साईनाथ दुर्गे आणि सहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. साईनाथ दुर्गे आणि इतर सहा जणांची न्यायालयीन कोठडी गुरुवारी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. बोरीवली न्यायालयाने साईनाथ दुर्गे यांच्यासह अशोक मिश्रा, मानस अनंत कुवर, विनायक डायरे, रविंद्र चौधरी, अक्षय धनधर आणि यशवंत विचले या सहा संशयितांना जामीन मंजूर केला होता. ज्येष्ठ वकील राजेश मोरे, ज्येष्ठ वकील अनिल पार्टे, प्राची पार्टे, मेराज शेख यांनी या प्रकरणी संशयितांच्या बाजूने बोरीवली न्यायालयात युक्तिवाद केला होता.

- Advertisement -

दरम्यान, न्यायालयाने या सातही संशयितांना जामीन मंजूर करताना काही अटी-शर्ती पालन करण्यात सांगितल्या आहेत. या अटी-शर्ती पाळल्या नाहीत तर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. तसेच संशयितांना दर सोमवारी दहिसर पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लागणार आहे. याशिवाय सोशल मीडिया न वापरणे आणि मुंबई बाहेर न जाण्याच्या अटींवर संशयितांना 20 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

साईनाथ आमचा वाघ – आदित्य ठाकरे
साईनाथ दुर्गे याला शिलम म्हात्रे प्रकरणात पोलीस कोठडी सुनावली तेव्हा आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या दादरच्या घरी जावून कुटुंबियांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी साईनाथ आमचा वाघ असल्याचे वक्तव्य केले होते. आदित्य म्हणाले की, साईनाथ आमचा वाघ, तो अन्यायाच्या विरुद्ध लढतो आहे. या राज्यात मोगलाई आल्यासारखी धरपकड सुरू आहे. तरुणांवर खोटे आरोप लावून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रयत्नाविरुद्ध आम्ही लढू आणि यापुढेही लढत राहू. अशा मोगलाईला आम्ही घाबरत नाही. या महाराष्ट्रात आम्ही अन्यायाविरुद्धल लढत राहू, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -