घरताज्या घडामोडीसंजय राऊतांना आवरा, चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांना विनंती

संजय राऊतांना आवरा, चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांना विनंती

Subscribe

शिवसेना खासदार संजय राऊत यांची भाषा ही शिवसेना संपवण्याचे कंत्राट घेतल्यासारखी आहे. यातून शिवसेनेची प्रतिमा बिघडत चालली आहे. त्यामुळे मी गेली दोन दिवस मुख्यमंत्री उद्धवजींना राऊतांना आवरा, अशी विनंती करत असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी म्हटले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या 27 महिन्यांत शिवसेनेचा एकही प्रवक्ता बोलताना दिसला नाही. फक्त एकच प्रवक्ता बोलत आहे. हे एकमेव प्रवक्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना, केंद्र सरकारला, राज्यपालांना शिव्या देत आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे बोलायचे; पण त्यांची भाषा कडक असायची. शिवराळ नसायची, असेही पाटील यांनी सांगितले. उद्धवजी ठाकरे यांना राज्य चालवायचे आहे. त्यामुळे त्यांनी बिघडत चाललेल्या महाराष्ट्रातील संस्कृतीचा व्यवस्थित विचार करायला हवा, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले.

- Advertisement -

400 पेक्षा जास्त जागा

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, २०१९ ला असेच सर्व पक्ष एकत्र आले होते. मतमोजणीच्या वेळी सर्वजण नवेकोरे कोट घालून दिल्लीत आले होते. परंतु त्यांचे त्यानंतर काय झाले, ते संपूर्ण देशाने पाहिले आहे. आता २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -