घरमुंबईकृती दलाशी चर्चा करूनच शाळांचा निर्णय

कृती दलाशी चर्चा करूनच शाळांचा निर्णय

Subscribe

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कृती दलाशी चर्चा करून घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिली.

दरम्यान, राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करावेत, असा निर्णय झाला असून तशा सूचना देण्यात आल्याचेही पवार यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. आपला पाल्य ज्या शाळेत जातोय त्या शिक्षकांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यास पालकांना दिलासा मिळेल, असेही पवार म्हणाले.

- Advertisement -

केंद्र सरकारकडून गर्दी करणारे उत्सव घरगुती पद्धतीने साजरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही राज्यात शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र, काही दिवसांतच विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. शिवाय तिसर्‍या लाटेत सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आणि दुसरा क्रमांक हा महाराष्ट्राचा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने राज्याला काही सूचना केल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -