घरCORONA UPDATEशिक्षण प्रमुखांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; राज्यातील शिक्षण व्यवस्था बदलण्याच्या मार्गावर

शिक्षण प्रमुखांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; राज्यातील शिक्षण व्यवस्था बदलण्याच्या मार्गावर

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यातील शाला मार्चपासून बंद आहेत. अनेक विद्यार्थ्यांच्या परिक्षाही रद्द झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जूनपासून शालेय वर्ष सुरू करण्याच्या दृष्टीने सरकार आता पावलं टाकत आहेत. त्यासाठी आज शालेय शिक्षण नेते व प्रमुखांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. दरम्यान, विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने शिक्षण देण्याचा विचार शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत समोर आला. एका बाकावर एक विद्यार्थी असा नियम करण्याची शक्यता आहे. विद्यार्थी-शिक्षकांमध्ये ‘कोरोना’चा प्रादुर्भाव आणि प्रसार टाळण्यासाठी प्रभावी नियम आणि अंमलबजावणी करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. या बैठकीत मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार कपिल पाटील, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्यासमवेत रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल पाटील, अनिरुद्ध जाधव तसेच इतर शिक्षण तज्ज्ञही उपस्थित होते.

 हेही वाचा – पेट्रोलचे दर, गॅस सिलिंडर, रेशनकार्ड, रेल्वे यासह ‘हे’ नियम उद्यापासून बदलणार

- Advertisement -

शालेय शिक्षण विभाग बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

• जून पासून शिक्षण सुरू करावे. शाळा च सुरू कराव्यात असे नाही.
• ऑनलाइन, ऑफलाइन अशा सर्व पद्धतीने शक्य आहे त्याप्रमाणे शिक्षण सुरू व्हावे.
• मुलांचे वर्ष वाया जाऊ देणार नाही.
• शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते थांबू नये
• ज्या शाळा क्वारंटाईन करण्यासाठी ताब्यात घेतल्या होत्या त्यांचे शासन खर्चाने निर्जंतुकीकरण करून देण्यात येईल
• दुर्गम भागांत जिथे कनेक्टिविटी नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून शाळा सुरू कराव्यात
• ज्या ठिकाणी फिजीकल शाळा सुरू करणे अडचणीचे आहे त्या ठिकाणी इतर पर्याय तसेच ऑनलाइन शिक्षण सुरू करावे
• जूनमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपले शालेय वर्ष सुरू झालेच पाहिजे. आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरू करता येणे शक्य आहे तिथे त्या सुरू करणे तसेच जिथे ऑनलाईन शक्य आहे तिथे त्या पद्धतीने का होईना पण शिक्षण सुरू झाले पाहिजे.
• कोरोना सारख्या परिस्थितीत शिक्षणाला अडथळा येत नाही हे महाराष्टाने देशाला दाखवून द्यावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
• गुगल प्लॅटफॉर्मचा प्रायोगिक स्तरावर वापर करावा मात्र स्वतंत्रपणे संगणकीय पद्धती विकसित करून ऑनलाईन शिक्षणाची मजबूत यंत्रणा दीर्घ काळासाठी विकसित करावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -