घरCORONA UPDATEमुंबईतील चाकरमान्यांना कोकणात पाठवा; शिवसेना आमदाराची मागणी

मुंबईतील चाकरमान्यांना कोकणात पाठवा; शिवसेना आमदाराची मागणी

Subscribe

मुंबईत अडलेल्या कोकणातील चाकरमान्यांना भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी एसटीने गावी सोडण्यात यावे, अशी मागणी केल्यानंतर शिवसेना आमदाराने देखील जठार यांच्या सुरात सूर मिळवला असून, मुंबईत अडकलेल्या कोकणवासीयांना गावी जाण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. गुहागरचे शिवसेना आमदार आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी ही मागणी केली आहे.

मुंबईत अडलेल्या कोकणातील चाकरमान्यांना भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी एसटीने गावी सोडण्यात यावे, अशी मागणी केल्यानंतर शिवसेना आमदाराने देखील जठार यांच्या सुरात सूर मिळवला असून, मुंबईत अडकलेल्या कोकणवासीयांना गावी जाण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. गुहागरचे शिवसेना आमदार आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी ही मागणी केली आहे. माझ्या कोकणातील रोजीरोटी निमित्त मुंबई गेलेले चाकरमान्याना कोकणात परत येण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून लोक रोजीरोटीच्या निमित्ताने गेलेले आहेत. त्यांच्यात कोकणातील लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. मुंबईमधली आजची परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीपासूनच मी सांगत आलोय कोकणातील लोकांना कोकणामध्ये येवू द्या. तिथे गावामध्ये त्यांची घरे आहेत. त्यांना मोकळा श्वास घेता येइल. अजूनही वेळ गेलेली नाही, अशी विनंती भास्कर जाधव यांनी केली.

तपासणी करून कोकणात सोडा

दरम्यान मुंबईत अडकलेल्या चाकरमान्यांना  तपासणी करुन सरकारने घरी सोडावे. तसेच राज्य सरकारने एसटी पाठवून या चाकरमान्यांना त्यांच्या घरी पोहोचावे. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगसाठी एका बसमध्ये केवळ ३० प्रवासी आणावे. या नागरिकांच्या कोरोना चाचणी केल्यानंतरच त्यांना त्यांच्या घरी सोडवावे. जर, घरामध्ये जाण्याची सरकारची परवानगी नसेल तर शाळेत त्यांना क्वॉरंटाईन करण्याची व्यवस्था करण्यात येईल असे देखील भास्कर जाधव म्हणालेत. एसटीने चाकरमान्यांना कोकणात आणले तर त्यांची तपासणी करणे सोपे होईल असे भास्कर जाधव म्हणाले. दरम्यान खासगी वाहनांनी आणले तर त्यांच्यावर नियंत्रण करणे अवघड असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. ज्या ठिकाणाहून हे प्रवासी निघतील तिथे यांची तपासणी करण्यात येईल आणि ती एसटी ज्या गावातील असेल त्याच्या सीमेवर थांबून त्यांची तपासणी आपण करुया. हे सहज सोपे होईल. आजही कोरोना वाढण्याची भिती वाढत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. कोकणातील लोकांना कोकणात येवू द्या, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -