घरमुंबईशांघायमधील उपाययोजना मुंबईसाठीही महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री

शांघायमधील उपाययोजना मुंबईसाठीही महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री

Subscribe

शांघाय आणि मुंबई ही दोन जुळी (सीस्टर सिटीज) शहरे आहेत. त्यामुळे शांघायमधील चीनच्या नागरी सुरक्षेबाबतच्या उपाययोजना मुंबईतही उपयुक्त ठरू शकतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

शांघाय आणि मुंबई ही दोन जुळी (सीस्टर सिटीज) शहरे आहेत. त्यामुळे शांघायमधील चीनच्या नागरी सुरक्षेबाबतच्या उपाययोजना मुंबईतही उपयुक्त ठरू शकतील. तसेच विविध विकासाभिमुख प्रकल्पांत चीनचे सहकार्य निश्चितच महत्त्वपूर्ण ठरू शकेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. चीनचे नागरी सुरक्षा मंत्री झाओ केझी यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज, बुधवारी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

महत्त्वाच्या खात्याचे अधिकारी हजर 

यावेळी चीनच्या शिष्टमंडळातील सदस्य भारतातील चीनचे राजदूत लुओ झाओई, चीनचे नागरी सुरक्षा विभागाचे उपमंत्री झू गान्लू, उपसचिव मेंग याँग,नमहासंचालक नागरी सुरक्षा झांग होंन्ग्बो, ली झियान्फ, आंतरराष्ट्रीय सहकार्य विभागाचे महासंचालक लियो जीनराँग, परराष्ट्र व्यवहार विभागाच्या उपमहासंचालक होऊ याँकी, गुओ लीन यांच्यासह गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

मुंबई हे संवेदनशील शहर 

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘मुंबई ही भारताची वित्तीय, व्यावसायिक तसेच मनोरंजनाच्या दृष्टीने राजधानी आहे. मुंबई हे देशासाठी पॅावर हाऊस समजले जाते. भारताच्या आर्थिक वृद्धीच्या बाबतीत तसेच परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्राचे आणि पर्यायाने मुंबईचे योगदान सर्वाधिक आहे. मुंबई हे जागतिक दृष्ट्या महत्त्वाचे तसेच संवेदनशील शहर आहे. त्यामुळे येथील सुरक्षेच्या उपाययोजनांच्या बाबतीत आम्ही नेहमीच सतर्क आहोत. गेल्या दहा वर्षात त्यादृष्टीने अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यामुळेच चीनच्या नागरी सुरक्षेच्या क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान या ठिकाणी निश्चितच उपयुक्त ठरेल. शांघाय आणि मुंबई यांना सिस्टर सिटीज म्हटले जाते. त्यामुळे शांघायमधील नागरी सुरक्षेच्या उपाययोजना मुंबईत राबविणे महत्त्वपूर्ण ठरेल. त्यादृष्टीने दोन्ही देशांचे सहकार्य वृद्धींगत करता येईल. महाराष्ट्रात पायाभूत सुविधा तसेच अन्य महत्त्वपूर्ण उत्पादन क्षेत्रातही चीनच्या कंपन्या कार्यरत आहेत. आगामी काळातही हे सहकार्य असेच वाढीस लागतील याकरता प्रयत्न केले जातील.’

केंद्रीय गृह मंत्रालयाशीही महत्त्वपूर्ण करार

चीनचे नागरी सुरक्षा मंत्री केझी म्हणाले, ‘नागरी सुरक्षा आणि लोकाभिमुख सेवा देण्याच्या दृष्टीने प्रकल्प राबविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यादृष्टीने भारताच्या केंद्रीय गृह मंत्रालयाशीही महत्त्वपूर्ण करार करण्यात आला आहे. दहशतवादाशी मुकाबला आणि शांतता सुव्यवस्थेच्या दृष्टीने भारत आणि चीनचे नेतृत्व सहमत आहेत. त्यामुळेच मुंबईसारख्या शहरावरील दहशतवादी हल्ल्याचे वैषम्य वाटते. शांघाय या शहराला चीनच्या अन्य प्रांतातही मेट्रो तसेच नागरी सुरक्षा व विकासाभिमुख प्रकल्प राबविण्यात आले आहेत. याचदृष्टीने भारतातील विविध प्रकल्पांतील गुंतवणूक आणि सहकार्यालाही चालना देण्याचे प्रयत्न आहेत.

- Advertisement -

देशाच्या सुधारणेत राज्याचे योगदान 

याचवेळी केझी यांनी मुख्यमंत्री यांच्या वाटचालीचे कौतुक केले. तरूण आणि भविष्याचे वेध घेणारे नेतृत्त्व असल्याचे नमूद करून ते म्हणाले, आर्थिक विकासासह पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक आणि नागरीकरणाचा महाराष्ट्रातील वेग महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच भारताच्या सुधारणा क्षेत्रात महाराष्ट्राचे योगदानही लक्षवेधी ठरेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -