घरमुंबईमग शिवरायांचा संघर्ष कोणासोबत? तावडेंच्या स्पष्टीकरणावर आव्हाडांचा प्रतिप्रश्न

मग शिवरायांचा संघर्ष कोणासोबत? तावडेंच्या स्पष्टीकरणावर आव्हाडांचा प्रतिप्रश्न

Subscribe

Jitendra Awhad Questioned to vinod Tawade | मुघलांचा अभ्यास इतिहासातून काढून टाकण्यासंदर्भातील मुद्द्यांवरून दोघांमध्ये वाद वाढला असून विनोद तावडेंनी व्हिडीओ प्रसारित केल्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांनीही त्यांना प्रत्युत्तर देत एक प्रश्न विचारला आहे.

Jitendra Awhad Questioned to vinod Tawade | मुंबई – राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Leader Jitendra Awhad) आणि भाजपा नेते विनोद तावडे (BJP Leader Vinod Tawde) यांच्यात आता ट्विटर वॉर रंगू लागले आहे. मुघलांचा अभ्यास इतिहासातून काढून टाकण्यासंदर्भातील मुद्द्यांवरून दोघांमध्ये वाद वाढला असून विनोद तावडेंनी व्हिडीओ प्रसारित केल्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांनीही त्यांना प्रत्युत्तर देत एक प्रश्न विचारला आहे.

हेही वाचा मुघलांचा इतिहास काढणार म्हणजे…, कसाबचा दाखला देत विनोद तावडेंनी दिलं स्पष्टीकरण

- Advertisement -

मुघलांचा इतिहास काढणार असं मी म्हणालो होतो. याचा अर्थ छत्रपतींच्या शौर्याचा इतिहास काढणार असं होत नाही, असा खुलासा माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केला होता. त्यावर जितेंद्र आव्हाडांनीही आता प्रतिक्रिया दिली आहे. आभार विनोद तावडे. प्रामाणिकपणे कबूल केलेत की आपण मुघलांचा इतिहास काढणार होतात .. आता जे आज सारवासारव करत आहात त्यातला एक शब्दही आपण बोलला नव्हता .. छत्रपतींच्या शौर्याचा इतिहास आपण काढणार असे मी म्हंटले नाही पण मग महराजांचा संघर्ष कुणाबरोबर झाला. एवढाच प्रश्न?


जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले होते?

- Advertisement -

एमपीएससीच्या परीक्षेतून महाराष्ट्राच्या इतिहासाचा विषयच काढून टाकला. विनोद तावडेंनी जाहीर केलं होतं की मुघलांचा इतिहास काढून टाकणार. मग शिवाजी महाराज काय गोट्या खेळले दाखवणार? अफजल खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना! तुम्ही मुघलांचा इतिहास काढल्यावर कसं चालेल”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.

विनोद तावडेंनी काय स्पष्टीकरण दिलं?

“मी मुघलांचा इतिहास काढणार होतो असं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले. मुघलांचा इतिहास काढणार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्याचा इतिहास काढणार नाही. मुघलांचा इतिहास काढणार म्हणजे याचा अर्थ अदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही हे शिकवणं बंद करणार. मुघलांच्या काळात स्थापत्यशासन खूप चांगलं होतं, त्यांनी कलेला आश्रय दिलं, असं नाही. आधीच्या काळातही असं होतं. अकबर दि ग्रेट ज्याने लाखो हिंदूंची कत्तल केली. ते शिकवणं काढणार. शिवाजी महाराज कुशल प्रशासक होते हे सांगितलं, त्यांचं शौर्य काय आहे हेही सांगितलं. मला जितेंद्र आव्हाडांचं लॉजिक कळत नाही की शाहिस्तेखान शिकवला म्हणजे शिवाजी महाराजाचं शौर्य कळतं. त्यांना असं म्हणायचं आहे का कसाब आला म्हणून करकरे, कामटेआणि ओमाळेंचं शौर्य दिसलं? ते आधीपासूनच शूर होते, त्यासाठी कसाबला येण्याची गरज नव्हती. तरीसुद्धा मला म्हणायचं की मुघलांचा इतिहास म्हणजे कुतुबाशाही, आदिलशाही शिकवणं बंद झाली पाहिजे,” असंही त्यांनी पुढे स्पष्टीकरण दिलं.

हेही वाचा – …तर रावण काढून रामायण समजावून सांगा, जितेंद्र आव्हाड वक्तव्यावर ठाम!

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -