राज्यात कोरोनामुळे असामान्य परिस्थिती उद्भवलेली असताना इतर सर्व कामकाजाप्रमाणेच सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या देखील प्रलंबित राहिल्या आहेत. सामान्यपणे प्रत्येक वर्षाच्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये राज्य सरकारच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. मात्र, यंदा कोरोनाच्या साथीमुळे या बदल्या प्रलंबित राहिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्यासाठी शासन आदेश (GR) काढला आहे. या आदेशांनुसार येत्या ३१ जुलैपर्यंत सरकारमधल्या प्रलंबित बदल्यांपैकी १५ टक्के बदल्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उपसचिव गीता कुलकर्णी यांच्या सहीनिशी हा शासन आदेश काढण्यात आला आहे.
- Advertisement -