घरमुंबईया राज्यातील शिक्षक बनणार अधिक तंत्रस्नेही

या राज्यातील शिक्षक बनणार अधिक तंत्रस्नेही

Subscribe

शाळेतील शिक्षक, शिक्षण तज्ञ, शिक्षण अधिकारी, एनसीआरटी व बालभारतीच्या संयुक्तपणे शिक्षण क्षेत्रातील बदलांचा व नव्या आव्हानांचा आढावा घेण्यात येत आहे. कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्यातरी शिक्षण चालू होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण प्रणालीमध्ये अभूतपूर्वी बदल घडून आला आहे. तंत्रज्ञान व अध्ययन व अध्यापन प्रक्रिया बदलली आहे. त्यामुळे भविष्यातील शिक्षक हा अधिक तंत्रस्नेही असावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी तंत्रज्ञान फोरम तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.

शाळेतील शिक्षक, शिक्षण तज्ञ, शिक्षण अधिकारी, एनसीआरटी व बालभारतीच्या संयुक्तपणे शिक्षण क्षेत्रातील बदलांचा व नव्या आव्हानांचा आढावा घेण्यात येत आहे. कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्यातरी शिक्षण चालू होते. हे ऑनलाईन शिक्षण चालू ठेवण्यासाठी शाळा प्रशासन, केंद्र प्रमुख, शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, लोकप्रतिनिधी त्याचबरोबर अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन शिक्षणाची गंगा कोरोनातही चालू ठेवली. त्यामुळे भविष्यातील शिक्षक हा अधिक तंत्रस्नेही असेल यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर होणार्‍या स्पर्धा परीक्षांसाठी तयार केले जाईल. असे करताना जिल्हा पातळीवर सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असे शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले. शालेय शिक्षणाबरोबरच सहशालेय उपक्रम, आधुनिक भौतिक सुविधा, प्रशिक्षण देण्यासाठी सरकारने योजना सुरू केल्या आहेत.

- Advertisement -

राज्यातील पालक विद्यार्थी यांचा आत्मविश्वास वाढला. शिक्षकांनीही कोरोनाच्या काळात आपल्या विद्यार्थ्यांशी व पालकांशी संवाद साधत अव्याहतपणे आपले काम चोखपणे केले आहे. घरातील प्रत्येकाशी निगडित असलेल्या शालेय शिक्षण विभागाकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. राज्यातील काही जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू झाली आहे. शाळा सुरू नाहीत त्या ठिकाणी ऑनलाईन शिक्षण पध्दती सुरळीतपणे चालू आहे. या कोरोनाच्या काळात शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी दाखवलेला संमय व आत्मविश्वास नक्कीच कौतुकास्पद आहे असे प्रशंसोद्गगार शालेय शिक्षण मंत्र्यांनी काढले.

विद्यार्थ्यांसाठी परीक्षा महत्त्वाच्या

राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे परीक्षा! या परीक्षा पध्दतीमध्ये कोणताही बदल सध्या तरी अपेक्षित नाही. परंतु दहावी व बारावीच्या परीक्षा या वर्षी उशिरा होतील असे सुतोवाच शिक्षण मंत्र्यांनी केले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा यावर्षी एप्रिलच्या शेवटच्या पंधरवड्यात व मे महिन्याच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्यातील भौगोलिक परिस्थिती पाहून हा निर्णय घेणार आहे. या संदर्भात परीक्षा मंडळाचे अधिकारी, शिक्षक, शिक्षण तज्ज्ञ व शाळा व्यवस्थापक यांच्याशी विचार विनिमय चालू आहे. सातत्यपूर्ण सर्वंकश निरीक्षण व मुल्यमापन पध्दतीनुसार प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे अवलोकन करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परीक्षा होतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -