मुंबई : शिवसेनेतून फुटलेले १६ आमदार पात्र की अपात्र याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावा, असे आदेश आज (11मे) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले. या १६ आमदारांमध्ये पहिले नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे. हा निर्णय घेण्यासाठी न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना वेळेचे बंधन दिलेले नाही. त्यामुळे विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे केव्हा यावरचा निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना (uddhav thackeray) टोला लगावला आहे. त्या म्हणाली की, आता हे सिद्ध झालंच … कावळा कोण आणि कोकिळा कोण?
उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात सांगितलं होतं की कावळा कोण आणि कोकीळा कोण हे निकालातून कळेल….@OfficeofUT
आता हे सिद्ध झालंच … कावळा कोण आणि कोकिळा कोण?
कावळा काव काव करत राहीला पण कोकीळेला न्याय मिळाला !
लोकशाहीचाच हा विजय!
राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच राहणार!
अभिनंदन,…— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 11, 2023