शहरात गर्दीच्या ठिकाणी एकट्या महिलेला बघून तिच्या गळ्यातील दागिने किंवा हातातील पर्स लंपास करणारी दक्षिण भारतीय महिला चोरांची टोळी मुंबईत दाखल झाली आहे. या टोळीतील तीन महिलांना वांद्रे पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून अनेक गुन्ह्याची उकल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रदीया राजा रंजिद्राय (२५) नदीया वासुदेवा (३५), पांडेश्वरी अजिज राजुमुत्तु (२४ ) असे अटक करण्यात आलेल्या महिला टोळीतील सदस्यांची नावे आहेत.
या महिलांना लुबाडले
भांडुप मध्ये राहणाऱ्या ६४ वर्षाच्या तक्रारदार हेलन फर्नाडिस ह्या गेल्या महिण्यात वांद्रे माऊंट मेरी या ठिकाणी दर्शनासाठी गेल्या होत्या,दर्शन घेऊन बाहेर आल्यावर त्या एका बाकड्यावर बसलेल्या असताना अटक महिलांपैकी एक महिला त्यांच्या बाजूला येऊन बसली. तिने हेलन यांना बोलण्यात गुंतवले. थोड्यावेळाने तीने हेलम यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी केली आणि तेथून पळ काढला. दरम्यान या टोळीतील तिघींनी कुर्ला पश्चिम येथे राहणाऱ्या सरला विल्बर्ट कोरीया यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी केली. या दोन्ही गुन्ह्यानंतर वांद्रे पोलिसांनी या टोळीचा शोध घेऊन त्यांना सीसीटीव्हीच्या आधारे अटक केली. या टोळीतील तिघींनी अटक करण्यात आले आहे. या टोळीतील आणखी काही महिला मुंबईत असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
हेही वाचा – ‘मुहूर्त’ बघूनच चोरी करणारे दोघे भामटे अटकेत!