मंत्रालयात अनेक वर्ष्यांपासून एकाच जागी काम करणाऱ्या ३०० अधिकाऱ्यांच्या बदल्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या. या बदल्या करण्यासाठी मागील मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील यासाठी प्रयत्न केला होता मात्र तो प्रयत्न अपयशी ठरला. सदर अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी मुख्यामंत्री ठाकरे यांना मुख्य सचिव सीताराम कुटे यांची मदत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
मंत्रालयात एकाच ठिकाणी तळ ठोकून असलेल अधिकारी सचिवांपेक्षा जास्त अधिकार गाजवत असल्याची चर्चा मंत्रालयातील अधिकारी वर्तुळात होत होती. एकाच विभागात अधिकारी अधिककाळ असल्याने कॅबिनेट सदस्याना बदली करणे कठीण होते . महाविकास आघाडी सत्तेत आल्यांनतर हि बाब प्रशासनाच्या निदर्शनास अणूनदेण्यात आली. या वर बराच काळ विचार करून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मंत्रालयातील एकाच जागी वर्षानुवर्षे कामकारणाऱ्या ३०० अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली.