येथील तुर्भे एमआयडीसीतील बोनसरी गावात भंगाराच्या गोदामात तिहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. चोरीच्या उद्देशाने गोदामातील तीन कामगारांची हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ज्या भंगाराच्या गोदामात ही घटना घडली ते गोदाम अनधिकृतपणे चालवण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. ४ लाखांच्या भंगारविक्रीवरून ही हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
(छाया – सुमित रेणोसे)
या घटनेत गोदामातील कामगारांवर डोक्यात जड वस्तूचा प्रहार करण्यात येऊन चाकूचे वार करण्यात आले आहेत. हत्येनंतर त्या तिघांचे मृतदेह त्याच ठिकाणी लपवण्यात आले होते. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरु आहे.
तुर्भे एमआयडीसीमध्ये तिहेरी हत्याकांड; ४ लाखांच्या भंगारविक्रीतून घडले हत्याकांड #Mumbai #NewMumbai #Turbhe #MyMahanagar
— My Mahanagar (@mymahanagar) July 13, 2019