घरताज्या घडामोडीबारमध्ये घडले दुहेरी हत्याकांड; पाण्याच्या टाकीत आढळले मृतदेह

बारमध्ये घडले दुहेरी हत्याकांड; पाण्याच्या टाकीत आढळले मृतदेह

Subscribe

लॉकडाऊनमध्ये दुहेरी हत्याकांडाचा धक्कादायक मीरारोडमध्ये घडल्याचे समोर आले आहे.

एकीकडे कोरोनाने मुंबईत कहर केला असताना दुसरीकडे लॉकडाऊनमध्ये दुहेरी हत्याकांडाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मीरारोडमधील एका बारमधील दोन कर्मचाऱ्यांची हत्या करुन त्यांचे मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार; मीरारोडच्या शीतल नगरमध्ये एमटीएनएल मार्गावर शबरी बार अँड रेस्टॉरंटमध्ये दुहेरी हत्याकांड घडल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती बार मालकाने मीरारोड पोलीस स्थानकाला दिली. या घटनेची माहितीमिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या टाकीत असलेले दोघांचे मृतदेह बाहेर काढले आहे. या मृतदेहाची ओळख पटली असून नरेश पंडित (५२) आणि हरेश शेट्टी (४८) अशी हत्या झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे असून हे दोघेही बारमधील कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, हे या मृतदेहाच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा आढळून आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पोलीस कसून शोध घेत आहेत. हा गुन्हा का आणि कोणी केला याचा सध्या शोध सुरु आहे.


हेही वाचा – आजपासून दुकाने, बाजारपेठाही खुल्या रिक्षा, टॅक्सी अत्यावश्यक कामांसाठी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -