घरमुंबईवसई विरारकरांवर जलसंकट

वसई विरारकरांवर जलसंकट

Subscribe

धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावला

पावसाने दडी मारल्याने वसई विरार शहर महापालिकेला पाणी पुरवठा करणारी पालघर जिल्ह्यातील तीन्ही धरणांतील पाणीसाठा पूर्णपणे खालावला आहे. येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस झाला नाही तर वसई विरारकरांवर तीव्र पाणीटंचाईचे संकट ओढवणार असल्याची भिती आहे.वसई विरार शहर महापालिकेची लोकसंख्या 17 लाखांच्या घरात गेली आहे. या मोठ्या नागरिकरणाला सूर्या धामणी, उसगाव आणि पेल्हार धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा पर्जन्याने चांगली सुरुवात केली नसल्याने त्याचा मोठा फटका नागरिकांना बसला आहे.

सूर्या धामणी धरण
वसई विरारकरांची तहान भागवणारे सूर्या धामणी धरण हे मुख्य धरण असून या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 276 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. सध्या 52.015 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 18.84 टक्के पाणीसाठा शिल्लक असून तो केवळ 26 दिवस पुरेल इतकाच आहे.

- Advertisement -

उसगाव धरण
वसई विरार शहर महापालिकेला पाणीपुरवठा करणारे वसई तालुक्यातील हे महत्वाचं धरण असून या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 4.96 दशलक्ष घनमिटर इतकी आहे. सध्या या धरणात 0.618 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 12.46 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असून तो केवळ 28 दिवस पुरेल इतकाच आहे.

पेल्हार धरण
नालासोपारा पूर्वेतील पेल्हार येथील पेल्हार धरण हे पालिकेला पाणीपुरवठा करनारे क्रमांक दोनचे धरण आहे. या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 3.56 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. सध्या या धरणात 0.287 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 8.03 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असून तो 30 दिवस पुरेल इतका आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -