घरमुंबईपावसामुळे टिटवाळ्यातील चाळींना नदीचे स्वरूप

पावसामुळे टिटवाळ्यातील चाळींना नदीचे स्वरूप

Subscribe

टिटवाळ्यातील इंदिरा नगर परिसरात मंगळवारी दुपारी अवघ्या तासाभराच्या पावसाने चाळीमधील ३० ते ३५ रुममधील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अनेक कुटुंबियांचे सामानाचे नुकसान झाल्याने आर्थिक फटका बसला आहे. सतत पडणार्‍या या पावसामुळे या चाळींना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

टिटवाळा पूर्वेतील इंदिरा नगर परिसरात जी. आर. पाटील शाळेच्या मागील परिसरात इंदिरा नगर, घोटसई, नांदप टेकडी परिसरात पावसाचे पाणी वाहून येते. मंगळवारी दुपारच्या सुमारास पडलेल्या अवघ्या तासाभराच्या पावसाने पाणीच पाणी झाले. चाळीच्या ३० ते ३५ घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने घरातील सामानाचे नुकसान झाल्याने कोरोना पार्श्वभूमीवर मेटाकुटीला आलेल्या चाळकरी कुटुंबियांना आर्थिक झळीला सामोरे जावे लागले आहे.

- Advertisement -

नैसर्गिक नाल्याचा प्रवाह भरणी करून बदलून अनधिकृत चाळी बांधल्या जातात. नैसर्गिक समतोल बिघडवला जातो. पाण्याचा निचरा होण्यास जागा न मिळल्याने दोन चाळींमधील मोकळ्या जागेतून पावसाचे निचरा न होणारे पाणी मार्ग काढते व त्यांचा फटका सर्वसामान्य चाळकर्‍यांना बसतो, असे जाणकारांचे मत असून कल्याण-डोंबिवली मनपा प्रशासनाने नाल्यासाठी डी.पी तयार करून नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह बदलणार्‍यावर कारवाईचा बडगा उचलला पाहिजे, अशी मागणी यानिमित्ताने जोर धरू पाहत आहे.

इंदिरा नगर परिसरातील रस्त्यांच्या दुतर्फा गटारे बांधून रस्ते बनविणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून पावसाचे पाणी पसरण्याला आळा बसून पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल, असे संपर्क साधला असता शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष कल्याण तालुका प्रमुख विजय देशेकर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -