घरठाणेपश्चिम घाटातील सातारा ते सिंधुदुर्गापर्यंत व्याघ्रक्षेत्र घोषित होणार

पश्चिम घाटातील सातारा ते सिंधुदुर्गापर्यंत व्याघ्रक्षेत्र घोषित होणार

Subscribe

पट्टेवाल्या वाघाचा संचार असल्यामुळे पश्चिम घाटातील सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतर्गत येणार्‍या जांभळीपाडा ते सिंधुदुर्गातील तिलारी खोर्‍यापर्यंतच्या जंगलाचे क्षेत्र हे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात येणार आहे. या भागात पट्टेवाला वाघ आढळून आला आहे. तसेच त्याच्या वास्तव्याच्या काही खुणाही सापडल्या आहेत. त्यामुळे या भागातील ६७.८२ चौरस किलोमीटरचे क्षेत्रफळ हे राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे.

सावंतवाडीतील तिलारी राखीव क्षेत्र 30 चौरस किमी आहे. आंबोली-दोडामार्ग राखीव क्षेत्र 57 चौरस कमी आहे. तसेच सातारा वन विभागातील जांभळी वनक्षेत्र 65 चौरस किमीमध्ये पक्षी संवर्धन केंद्र उभारणार आहेत. या क्षेत्राचे पक्षी आणि वन्यजीव संवर्धन असे दोन भागात विभाजन केले जाणार आहे.

- Advertisement -

कोयना, चांदोली, राधानगरी, तिलारी पुढे गोवा आणि कर्नाटकातील जंगल असा वाघांच्या संचाराचा मार्ग आहे. इथला जंगल परिसर वाघांसाठी पोषक असून, मानवी हस्तक्षेप या परिसरात कमी आहे. तसेच सिंधुदुर्ग, चंदगड या क्षेत्रामध्ये हत्तींचा अधिवास असल्याने राधानगरी अभयारण्याच्या दक्षिण बाजूला हत्ती आणि व्याघ्र प्रजनन केंद्र तयार केली जाणार आहेत.

आतापर्यंत महाराष्ट्रात 11 नवीन वन्यजीव संवर्धन राखीव क्षेत्रे जाहीर करण्यात आलीत. या क्षेत्रात पट्टेरी वाघ आणि अन्य वन्यजीव वनस्पतींच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, भूदरगड, गगनबावडा या भागात दोन संवर्धन क्षेत्रे राखीव ठेवण्यात आलीत.

- Advertisement -

विशालगड येथे 93 चौरस किमी, पन्हाळगड येथे 73 चौरस किमी, चंदगड येथे 225 चौरस किमी ही कोकण पश्चिम महाराष्ट्रातील राखीव क्षेत्रे आहेत. विदर्भ, नागपूर आणि अमरावतीत तीन क्षेत्रे नव्याने विकसित केली जाणार आहेत. कोयना, चांदोली अभयारण्यासाठी राखीव जागा आणि राधानगरी, तिलारी जंगलाचा परिसर हा टायगर कॉरिडोर म्हणून ओळखला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -