घरमुंबईकोहिनूर मिल खरेदी प्रकरण नेमकं आहे तरी काय?

कोहिनूर मिल खरेदी प्रकरण नेमकं आहे तरी काय?

Subscribe

कोहिनूर खरेदी प्रकरणी ईडीने राज ठाकरे आणि उन्मेश जोशी यांना नोटीस बजावली आहे.

कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी अंमलबजावणी संचालनलयाने अर्थात ईडीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उद्योगपती उन्मेश जोशी यांना नोटीस बजावली आहे. या नोटीशीनुसार सोमवारी उन्मेश जोशी यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले गेले आहेत. तर राज ठाकरे यांना २२ ऑगस्टला चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ‘ईडीच्या नोटीशीला भीक घालत नाही’, अशी तिखट प्रतिक्रिया दिली असली तरी राज ठाकरे यांचा कोहिनूरशी खरच काही संबंध आहे का? हे जाणून घ्यायला हवे.

हेही वाचा – तपास यंत्रणांना निष्पक्षपणे काम करु दिले पाहीजे – संजय राऊत

- Advertisement -

उन्मेश जोशी, राज ठाकरे आणि राजन शिरोडकर यांनी २००३ मध्ये कोहिनूर मिल नंबर ३ ही जागा लिलाव पद्धतीने विकत घेतली होती. ही जागा ४२१ कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली होती. या जागेवर कोहिनूर स्क्वेअर नावाची बहुमजली इमारत उभारण्यात येत आहे. ही इमारत उभारण्यासाठी उन्मेश जोशी यांच्या मालकीची कोहिनूर सीटीएनएल कंपनी काम करत होती. राज ठाकरे आणि राजन शिरोडकर बरोबरीचे भागीदार होते. कोहिनूर मिल जागेवर अवाढव्य बहुमजली इमारत बांधली जात आहे. त्यामुळे भविष्यातील व्यापाऱ्याच्या दृष्टीकोनाने सरकारी क्षेत्रातील कंपनी आयएल अँड एफएसने २२५ कोटी रुपयांची गुंतवणूक कोहिनूर सीटीएनएलमध्ये केली. परंतु, २००८ मध्ये या कंपनीने आपले २२५ कोटी रुपयांचे सर्व शेअर्स फक्त ९० कोटी रुपयांत कोहीनूर एमटीएनएल कंपनीला विकले. विशेष म्हणजे त्याचवेळी राज ठाकरे यांनी देखील आपले सर्व शेअर्स कंपनीला विकले आणि कंपनीतून काढता पाय घेतला.

हेही वाचा – ईडीला चौकशीसाठी सहकार्य करेन – उन्मेश जोशी

- Advertisement -

यानंतर कोहिनूर सीटीएनएल सोबत गुंतवणुकीत मोठा तोटा सहन केल्यानंतरही कंपनी आयएल अँड एफएसने कोहिनूर सीटीएनएलला अॅडव्हान्स लोन दिले. मात्र, त्या कर्जावर उन्मेश जोशींच्या कंपनीला भागले नाही. कर्जाचे परतफेड करण्यासाठी उन्मेश यांच्या कंपनीने आपली संपत्ती विकून ५०० कोटी रुपयांचे कर्ज भागवण्याच्या करारावर सह्या केल्या. या करारानंतरही आयएल अँड एफएस कंपनीने कोहिनूर सीटीएनएल कंपनीला १३५ कोटींचे कर्ज दिले. यामध्ये आयएल अँड एफएस कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता विषय ईडीकडे गेला आहे. ईडीने याअगोदर आयएल अँड एफएस कंपनीच्या एका बड्या अधिकाऱ्याचा जबाब नोंदवला आहे. त्यानंतर आता उन्मेश जोशी यांची चौकशी होत आहे. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी राज ठाकरे यांची चौकशी ईडीकडून होणार आहे.


हेही वाचा – राज ठाकरे यांची ईडीचौकशी आधीच कार्यकर्त्यांची बॅनरबाजी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -