घरमुंबई'राज्य सरकारला पाकिस्तानी शेतकऱ्यांबद्दल प्रेम का?' 

‘राज्य सरकारला पाकिस्तानी शेतकऱ्यांबद्दल प्रेम का?’ 

Subscribe

एमएमटीसीने पाकिस्तानी कांद्याच्या आयातीसाठी निविदा काढली असल्याचे सांगत भाजप सरकारची पाकिस्तानबाबत दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

“महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखालील एमएमटीसीने (मेटल्स अँड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन)ने पाकिस्तानी कांद्याच्या आयातीसाठी निविदा काढली आहे. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या राज्य सरकारला पाकिस्तानी शेतकऱ्यांबद्दल प्रेम का उफाळून आले आहे?”, असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

हेही वाचा – निवड रद्द झालेल्या सहायक मोटार वाहन निरिक्षकांना सरकारचा दिलासा

पाकिस्तानबाबत भाजपाची दुटप्पी भूमिका

“महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखालील एमएमटीसीने (मेटल्स अँड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन) ने काही दिवसांपूर्वी पाकिस्तान, इजिप्त आणि अफगाणिस्तान या देशातून दोन हजार टन कांद्याची आयात करण्यासाठी ६ सप्टेंबर रोजी निविदा काढली आहे. इतरवेळी पाकिस्तानला दुषणं द्यायची आणि दुसरीकडे पाकिस्तानचा कांदा आयात करायचा हा भारतीय जनता पक्षाचा दुतोंडीपणा आहे. कांद्याचे भाव वाढले तर शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे पडतील, परंतु भाजपला शेतकऱ्यांची चिंता नाही. हे सरकार शेतकरीविरोधी असून भाजपला फक्त व्यापाऱ्यांचीच चिंता जास्त आहे. दिवाळीनंतर खरीप हंगामातील कांदा बाजारात येणार असताना पाकिस्तानातून आयात करण्याची गरजच काय? पाकिस्तानबद्दल कोणीही काही बोलले की लगेच त्याला पाकिस्तान समर्थक ठरवून अगदी देशद्रोहाचा शिक्का मारण्याचा एककलमी कार्यक्रम भाजपा व त्यांच्या समर्थकांनी सुरु केला आहे”, असा आरोप आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

- Advertisement -

नेहमी पाकिस्तानच्या नावाने ओरडणाऱ्या भाजपाला पाकिस्तानचा कांदा कसा काय चालतो? यातून भाजपा कसले देशप्रेम सिद्ध करत आहे? पाकिस्तानचा कांदा आणून आपल्या शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचा भाजपा सरकारचा हा प्रयत्न आहे.
आमदार बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -