घरताज्या घडामोडीधक्कादायक! महिलेला जिवंत जाळताना आली दुर्गंधी आणि...

धक्कादायक! महिलेला जिवंत जाळताना आली दुर्गंधी आणि…

Subscribe

पनवेलमधील दुन्द्रे गावात महिलेला मारुन तिला फासावर लटकावून तिची निघृण हत्या केल्याची धक्कादयक घटना घडली आहे.

वर्धा येथील हिंगणघाट येथील चौकात महाविद्यालयात शिक्षिका असलेल्या तरुणीला भरचौकात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला गेला तर दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात एका ५० वर्षीय महिलेला गावातील बीअर बार चालकाने रात्री घरात घुसून अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. या दोन्ही घटना घडल्याने महाराष्ट्र हादरला असताना पुन्हा एकदा अशीच एक घटना नवी मुंबईत घडल्याचे समोर आले आहे. एका ५५ वर्षीय महिलेला जाळून मारण्याचा प्रयत्न झाला. मात्र, दुर्गंधी पसरल्याने मारेकऱ्यांनी महिलेला फासावर लटकावून तिची निघृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येचा गुन्हा दाखल केल्याने तर्कवितर्क मांडले जात असून नवी मुंबईत खळबळ उडाली आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार; पनवेलमधील दुन्द्रे गावात ही घटना घडली आहे. शारदा माळी असे या मृत महिलेचे नाव आहे. शारदा माळी यांना आधी जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, दुर्गंधी पसरल्याने मारेकऱ्यांनी त्यांना फासावर लटकावून त्यांची निघृण हत्या केली, असा आरोप शारदा माळी यांच्या घरच्यांनी केला आहे. याप्रकरणी पाच संशयित आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. राज्यात चार दिवसांत महिलेला जाळून मारण्याची ही तिसरी घटना आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महिलेंच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Video: माटुंगा रोड रेल्वे पुलावर तरुणीचा विनयभंग!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -