घरताज्या घडामोडीयोगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर काँग्रेसची टीका

योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर काँग्रेसची टीका

Subscribe

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत येऊन महाराष्ट्राच्या उद्योजक आणि बॉलिवूड निर्मात्यांची भेट घेणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक नेण्याचा त्यांचा डाव आहे. उद्योजक व बॉलिवूड निर्मात्यांना धमकावण्याचा प्रयत्न यातून केला जाऊ शकतो, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमवारी केली. त्यांचा हा कुटील डाव वेळीच ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारने राज्यातील उद्योगक तसेच बॉलिवूडच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील उद्योजक, बॉलिवूड यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे षडयंत्र मागील काही महिन्यापासून केले जात असल्याचे उघड झाले आहे. एनसीबीच्या माध्यमातून बॉलिवूडला बदनाम करण्याचे प्रयत्न सुशांतसिंग प्रकरणापासून कसे केले जात आहेत हेही स्पष्ट झाले आहे. मोदी सरकारच्या मदतीने महाराष्ट्राला बदनाम करण्याच्या मोहिमेत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा पुढाकार राहिलेल्याचा आरोपही सावंत यांनी लगावला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न २०१४ पासूनच होतो आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र असेच षडयंत्र करुन गुजरातला नेले गेले. आता बॉलिवूडचे महत्व कमी करुन उत्तर प्रदेशमध्ये दुसरा चित्रपट उद्योग निर्माण करण्याचा डाव आहे. त्यांच्या मुंबई भेटीत ते अशीच भीती दाखवून महाराष्ट्रातील गुंतवणूक आणि बॉलिवूड उत्तर प्रदेशला नेण्यासाठी घाट घालतील, अशी भीती सचिन सावंत यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -