घरनवी मुंबईकेंद्रीय अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारतासाठी तरतूद

केंद्रीय अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारतासाठी तरतूद

Subscribe

अवधूत वाघ यांच्याकडून कौतूक

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे ‘आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा एक योजनाबद्ध दस्तऐवज आहे. या अर्थसंकल्पात, गावे, गरीब, शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि व्यावसायिक या सर्वांचा विचार करण्यात आला आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी गुरुवारी पनवेल येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पत्रकार पत्रकार परिषदेचे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भरत जुमलेदार उपस्थित होते.

वाघ यांनी पत्रकारांना पुढे सविस्तर माहिती देताना सांगितले कि, मोदी सरकारच्या २०२१ -२२ च्या या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते, परिवहन, संरक्षणापासून ते सुरक्षेपर्यंत भारताला अर्थशक्ती बनवण्याचा एक सुदृढ पाया देखील समाविष्ट करण्यात आला आहे. हा सर्वांचा आणि सर्वांसाठीचा अर्थसंकल्प आहे. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला. भारतालाही त्याचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत, आर्थिक स्त्रोतांमध्ये वाढ करण्यासातही, नवे कर लावणे स्वाभाविक होते. मात्र, या अर्थसंकल्पात करांमध्ये काहीही वाढ करण्यात आलेली नाही आणि महागाई दर देखील ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. रस्ते, वीज, पाणी, रेल्वे,मेट्रो,मालवाहतूक मार्गिका, बंदरे, विमानतळ अशा पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मात्र ७ लाख ५४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

- Advertisement -

अर्थसंकल्पाची संपूर्ण देशाला उत्सुकता होती. कोविडच्या काळातही जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेल्या मोदी सरकारने या अर्थसंकल्पातही देशाच्या हिताचे निर्णय घेऊन व तरतूद करत सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प असून गावे, गरीब, शेतकरी, महिला, युवक, जेष्ठ नागरिक आणि व्यावसायिक यांचा विचार करून देश आत्मनिर्भर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

– आमदार प्रशांत ठाकूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -