घरनवी मुंबईनवी मुंबईत कोरोनाने ५० दिवसात एकही मृत्यू नाही

नवी मुंबईत कोरोनाने ५० दिवसात एकही मृत्यू नाही

Subscribe

कोरोनाची तिसरी लाट झपाट्याने वाढली व तितक्याच वेगाने ओसरली असून दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. २४ डिसेंबरपासून सुरू झालेली तिसरी लाट तितक्याच वेगाने ओसरल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

नवी मुंबईत आतापर्यंत कोरोनाचे २०४९ मृत्यू झाले आहेत. कोरोनाच्या तिन्ही लाटेत मृत्यूंचे प्रमाण हे दिवसाला सरासरी दोन ते चार इतके होते. मात्र तिसरी लाट ओसरल्यानंतर आता मृत्यूचे हे सत्र थांबले आहे. गेल्या ५० दिवसांत शहरात कोरोनाचा एकही मृत्यू झालेला नाही.

कोरोनाची तिसरी लाट झपाट्याने वाढली व तितक्याच वेगाने ओसरली असून दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. २४ डिसेंबरपासून सुरू झालेली तिसरी लाट तितक्याच वेगाने ओसरल्यामुळे दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या कार्यकाळात आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू ६० वर्षांवरील नागरिकांचेच झाले आहेत. नवी मुंबईत कोरोनाचा पहिला रुग्ण १३ मार्च २०२० रोजी सापडला. तर पहिला मृत्यू १५ मार्च २०२० रोजी झाला. ० ते ९ वयोगटातील फक्त एका मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर सर्वाधिक मृत्यू ज्येष्ठ नागरिकांचे झाले आहेत. तिसर्‍या लाटेत कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढल्याने पुन्हा शहरातील कोरोना केंद्रे सुरु करण्यात आली. महिनाभरातच वाशी वगळता इतर केंद्रे बंद करण्यात आली. शहरात ९ लाख ५१ हजारांच्यावर बाधितांची संख्या झाली असून २०४९ इतके मृत्यू झाले.

- Advertisement -

नवी मुंबई शहरात दैनंदिन रुग्णसंख्या शून्यावर आली. कोरोनाची स्थिती अत्यंत नियंत्रणात असून मागील जवळजवळ ५० दिवसांत एकाही नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही, ही समाधानकारक बाब आहे. पालिका प्रशासनाचे प्रयत्न व नागरिकांचे सहकार्य यामुळेच करोनावर मात करण्यात पालिकेला यश प्राप्त झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -