नवी मुंबई-: पनवेल महापालिका हद्दीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्याच्या दृष्टिकोनातून पाणी पुरवठ्यातील अडचणी लवकरात लवकर दूर करा,असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार्यांना मुंबईमध्ये आयेजित बैठकीत दिले.
पनवेलमधील पाणी समस्या दूर करण्यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे ३० जानेवारी रोजी बैठक पार पडली. या बैठकीला दोन्ही आमदारांसह ‘सिडको’चे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, नगरविकासचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, पाणी पुरवठा सचिव संजय खंदारे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा, मजिप्राचे सचिव अभिषेक कृष्णा, पनवेल पालिका आयुक्त गणेश देशमुख, माजी महापौर डॉ.कविता चौतमोल आदी उपस्थित होते.
पनवेल महापालिका स्थापन होऊन सहा वषपिक्षा अधिक काळ झाला आहे. येथील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्यत्वे सिडको, एमआयडीसी, जलसंपदा विभाग आदी प्रशासनावर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे बर्याचवेळा या प्रशासनांकडून पाणी पुरवठयाबाबत दिरंगाई झाल्यास त्याचा सर्वात जास्त त्रास पनवेलला बसतो. पनवेल महापालिकेचा पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतःचा असा पूर्ण क्षमतेचा स्वतंत्र जलस्त्रोत उपलब्ध नाही, त्यामुळे त्यांना कायमच दुसर्यांवर विसंबून राहावे लागते. पनवेलसाठी पाण्याचे स्वतंत्र आरक्षण असावे असा प्रस्ताव व पत्रे जलसंपदा विभागास पाठविण्यात आली असून त्याबाबत तातडीने निर्णय होणे गरजेचे आहे. तसेच सद्यस्थितीतील तूट भरून काढण्याकरिता पाताळगंगा नदीतून तातडीने प्रतिदिन १० दश लक्ष लिटर पाणी आरक्षण मिळण्याचा प्रस्ताव कोकण पाटबंधारे विभागाला सादर करण्यात आला आहे. तसेच पनवेल क्षेत्रातील भविष्यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या कोलाड येथील डोलवाल बंधार्यातून प्रतिदिन ५०० दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी आरक्षणाचा प्रस्ताव कोकण जलसंपदा कार्यकारी संचालकाकडे सादर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पनवेलमधील अंतर्गत पाणी टंचाई कमी होण्याच्या दृष्टिकोनातून तातडीने अंमलबजावणी करण्याची आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्याचबरोबर नवी मुंबई महापालिकेकडून पनवेल महानगरपालिका क्षेत्राला व शेजारील गावांना सुद्धा आवश्यकतेप्रमाणे पाण्याचे कनेक्शन दिले पाहिजेत, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. तर बाळगंगा धरणाची भूसंपादन प्रक्रिया तातडीने करण्याची आवश्यकता आहे तसेच पनवेल परिसरातील छोट्या धरणातून पाणी पुरवठा होऊ शकतो त्यासाठी शासनाने लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे आमदार महेश बालदी यांनी या चर्चेदरम्यान अधोरेखित केले.
पनवेल महानगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढत आहे, या अनुषंगाने पाण्याच्या नियोजनावर ताण येत असते. पाणी पुरवठा कायम व्हावा, यासाठी योग्य उपाययोजनांची गरज होती. आमचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेलच्या बाबतीत नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली आहे. पनवेलच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. पाणी पुरवठा संदर्भात त्यांनी केलेल्या सूचना व निर्देशामुळे पनवेलकरांना मोठा फायदा होणार आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
-प्रशांत ठाकूर, आमदार -पनवेल