घरनवी मुंबईनिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा दोन्ही मुलांवर गोळीबार

निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा दोन्ही मुलांवर गोळीबार

Subscribe

ऐरोली सेक्टर-२ मध्ये राहणाऱ्या एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने आपल्या पोटच्या दोन्ही मुलांवर गोळ्या झाडल्याची अत्यंत खळबळजनक घटना घडली होती.

गाडीचा हप्ता न भरल्याने बापाने स्वत:च्या दोन्ही मुलांवर गोळ्या झाडल्या. ज्यामध्ये एका मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ऐरोली सेक्टर-२ मध्ये राहणाऱ्या एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने आपल्या पोटच्या दोन्ही मुलांवर गोळ्या झाडल्याची अत्यंत खळबळजनक घटना घडली होती. ज्यामध्ये एका मुलाच्या थेट पोटाला गोळ्या लागल्याने मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी भगवान पाटील (वय ७१) हे निवृत्त पोलीस कर्मचारी आहेत. ते नवी मुंबईतच हवालदार पदावर कार्यरत होते. निवृत्तीनंतर ते आपल्या कुटुंबीयांसोबतच राहत होते.

मात्र, आपल्या दोन्ही मुलांशी त्यांचे सातत्याने वाद होत होते आणि त्यामुळेच त्यांची दोनही मुलं वेगवेगळी राहत होती. सोमवार, १४ जून रोजी अचानक भगवान पाटीलने आपल्या दोन्ही मुलांना घरी बोलावलं आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भगवान पाटीलचे विजय आणि सुजय ही दोन्ही मुलं वेगवेगळी राहत होती. आज या दोन्ही मुलांना भगवान पाटीलने घरी बोलावून घेतले. यावेळी भगवान पाटीलने आपल्या जवळील रिव्हाल्वरमधून अचानक दोन्ही मुलांवर चार गोळ्या झाडल्या. ज्यापैकी विजय पाटील याला तीन गोळ्या लागल्या. एक गोळी ही विजयच्या खांद्याला लागली तर गोळी थेट पोटात घुसली. तर विजयचा भाऊ सुजय पाटील याच्या पोटाला एक गोळी चाटून गेली. यामुळे सुदैवाने त्याला गंभीर इजा झाली नाही. तिसरी गोळी ही गाडीच्या काचेला लागली आहे.मात्र, विजय पाटील याच्या थेट पोटात गोळी घुसल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तात्काळ नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

- Advertisement -

दरम्यान, याप्रकरणी निवृत्त पोलीस अधिकारी भगवान पाटीलला रबाळे पोलिसांनी तात्काळ अटक केली. आरोपी भगवान पाटील याचा शीघ्रकोपी स्वभाव असल्याने त्याच्या दोन्ही मुलांचे त्याच्याशी अजिबात पटत नव्हते. त्यामुळे काही वर्षांपूर्वीच दोन्ही मुलांनी ऐरोलीतील घर सोडून दुसरीकडे आपले बिऱ्हाड वसवले होते. भगवान पाटीलने आपल्या दोन्ही मुलांना घरी बोलावून घेतले. यावेळी गाडीचा हप्ता न भरण्यावरुन त्याचा आपल्या मुलांशी वाद झाला. दोन्ही मुलांनी गाडीचा हप्ता वेळेत भरला नाही आणि त्यावरुनच त्यांच्यात वाद झाला व हा वाद एवढा टोकाला गेला की, भगवान पाटीलने आपल्या रिव्हाल्वरमधून थेट मुलांवर गोळ्या झाडल्या, असे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -