घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रडाळिंबासाठी ६ कोटी २४ लाख रुपये विमा मंजूर

डाळिंबासाठी ६ कोटी २४ लाख रुपये विमा मंजूर

Subscribe

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्यातील 1440 शेतकर्यांना 1063 हेक्टरवर असलेल्या डाळिंब पिकाच्या आंबे बहार करता 6 कोटी 26 लाख रुपये विमा सर्व अर्जदार शेतकर्‍यांना मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात व उपविभागीय अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत थोरात म्हणाले की, महसूलमंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या विविध योजना वाडीवस्तीवर पोहोचण्यासाठी सातत्याने काम केले जात आहे. यावर्षी निसर्ग चक्रीवादळ, त्याचप्रमाणे अतिवृष्टी आणि गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून या शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी नामदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला आहे.

याच बरोबर हवामान आधारित फळ पीक योजनेअंतर्गत सन 2019 – 2020 (आंबे बहार) डाळिंब पिकासाठी तालुक्यातील 1440 शेतकर्‍यांना 1063 हेक्टर क्षेत्राकरिता एकूण 6 कोटी 26 लाख रुपये विमा मंजूर झाला आहे. यामध्ये साकुर सर्कल करिता 1 कोटी 10 लाख तर त्या खालोखाल तळेगाव सर्कल करिता 80 लाख रुपये पीक विमा मिळाला आहे. तसेच आश्वी बु., धांदरफळ बु., डोळासणे, घारगाव, पिंपारणे, संगमनेर बु., शिबलापूर, समनापूर या सर्कलमधील सर्व अर्जदार शेतकर्यांचा समावेश आहे. संगमनेर तालुक्यात कमी पाऊस असल्याने शेतकर्यांनी आधुनिक पध्दतीने डाळिंब पिकाचे उत्पादन सुरु केले असून संगमनेर तालुका हा आता डाळिंबाचे आगार बनला आहे. शेततळे व डाळिंब शेती यामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळत आहे. मात्र वातावरणातील बदलामुळे यावर्षी विविध आलेल्या रोगांमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. मात्र शासनाच्या पीक विम्याच्या माध्यमातून होणार्‍या या मदतीने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. या विम्याची रक्कम आपल्या बँक खात्यावर मिळणार असून शेतकर्‍यांनी बँकेत संपर्क साधावा असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरोळे व तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -