घरपालघरवसई विरार परिसरात स्वतंत्र कामगार रुग्णालयाची मागणी

वसई विरार परिसरात स्वतंत्र कामगार रुग्णालयाची मागणी

Subscribe

वसईतील एकच खासगी रुग्णालयाचा यात समावेश ते सेवा देण्यास अपुरे पडत आहे. यासाठी वसई विरार परिसरात स्वतंत्र कामगार रुग्णालय कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी आमची वसईचे रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी केली आहे.

वसई विरार परिसरात किमान दोन लाख कामगार ईसीआयसी योजनेत समाविष्ट आहेत. या योजने अंतर्गत कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात. परंतू, वसईतील एकच खासगी रुग्णालयाचा यात समावेश ते सेवा देण्यास अपुरे पडत आहे. यासाठी वसई विरार परिसरात स्वतंत्र कामगार रुग्णालय कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी आमची वसईचे रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी केली आहे.

नोकरदार वर्गाला पीएफशिवाय, सरकारकडून ईएसआयसी अर्थात राज्य कर्मचारी विमा योजना दिली जाते. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांसह इतरही फायदे दिले जातात. ईएसआयसी कर्मचारी विमा योजना आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ही आरोग्य विमा योजना आहे. ज्या संस्थेमध्ये १० ते २० कर्मचारी किंवा त्याहून अधिक कर्मचारी असल्यास ही योजना लागू होते. केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना चालविली जाते. ईएसआयसीमध्ये कर्मचारी आणि कंपनी, या दोघांच्या रक्कमेचे योगदान असते. ही रक्कम वेळोवेळी बदलत असते. सध्या ईएसआयसीमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ०.७५ टक्के योगदान दिले जाते आणि कंपनीकडून ३.२५ टक्के योगदान असते. ज्या कर्मचाऱ्यांचे दररोजचे वेतन १३७ रुपये आहे. त्यांना आपल्या वेतनातील योगदान द्यावे लागत नाही. ईएसआयसीमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनाची मर्यादा आहे. २१ हजार रुपयांपर्यंत वेतन असलेले कर्मचारी या योजनेंतर्गत येतात, या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यापूर्वी मासिक वेतनाची मर्यादा १५ हजार रुपये इतकी होती. परंतु २०१६ मध्ये ती वाढवून २१ हजार रुपये करण्यात आली.

- Advertisement -

वसई विरार परिसरात साधारणतः पाच लाख कामगार कार्यरत असून त्यातील साधारणतः दोन लाख कामगार हे ईएसआयसीयोजने अंतर्गत समाविष्ट आहेत. ईएसआयसी योजनेंतर्गत कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबाला वैद्यकिय सुविधा पुरवल्या जातात. तब्येत बिघडल्यास मोफत इलाजाची सुविधा मिळते. ईएसआयसीच्या रुग्णालयात कर्मचाऱ्यांना मोफत इलाज केला जातो. गंभीर आजार असल्यास खासगी रुग्णालयात पाठवले जाते. खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर इलाजाचा संपूर्ण खर्च ईएसआयसीद्वारा केला जातो. वसई विरारमध्ये एकच खासगी रुग्णालय या योजनेत आहे. परंतु ते अपुरे पडत आहे. बर्न केअर सेंटर, कॅन्सर सेंटर, हृदयरोग, ट्रॉमा केअर सेंटरयुक्त अशा प्रकारच्या सुविधा एकच छताखाली असलेलं अद्यावत कामगार रुग्णालय येथे असणे आवश्यक असल्याचे ढगे यांचे म्हणणे आहे.

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. तेव्हा आमची वसईचे रुग्णमित्र राजेंद्र ढगे आणि उद्योजक समूहाचे पराग तोडणकर यांनी कामगारांच्या आरोग्याची चिंता व्यक्त करत ईएसआयसीचे स्वतंत्र असे अद्यावत सुविधा असलेले कामगार रुग्णालयाची मागणी केली. उद्योगधंद्याची भिस्त ही कामगारांवर देखील अवलंबून आहे, ही गरज ओळखत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले होते. राणे यांनी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे देऊ, असे आश्वासन यावेळी दिले.

- Advertisement -

हेही वाचा –

आयुष्यात उंदीर मारला नाही, ते कोथळा काय बाहेर काढणार? – राणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -