घरपालघरपालघरमधील भारत केमिकल कंपनीत भीषण स्फोट, ५ कामगार जखमी

पालघरमधील भारत केमिकल कंपनीत भीषण स्फोट, ५ कामगार जखमी

Subscribe

पालघर तारापूर एमआयडीसी परिसरातील भारत केमिकल्स कंपनीत भाषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात कंपनीतील ५ कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. शर्थीच्या प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पालघरच्या बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या भारत केमिकल्स कंपनीत हा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका तीव्र होता की आजूबाजूच्या परिसरात या स्फोटाचा आवाज आला. मात्र या स्फोटाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या अपघातामध्ये अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -