घरपालघरऐतिहासिक वारसा दुर्लक्षित; जुना राजवाडा मोजतोय अखेरची घटका

ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित; जुना राजवाडा मोजतोय अखेरची घटका

Subscribe

जव्हारमधील ऐतिहासिक वारसा लाभलेला जुना राजवाडा सध्या अखेरच्या घटका मोजत आहे. या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाड्याचा परिसर बकाल बनत चालला आहे.

जव्हारमधील ऐतिहासिक वारसा लाभलेला जुना राजवाडा सध्या अखेरच्या घटका मोजत आहे. या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाड्याचा परिसर बकाल बनत चालला आहे. जव्हारच्या जनतेच्या अस्मितेचे प्रतिक असणाऱ्या जुन्या राजवाड्याची वास्तू व परिसर बकाल बनला असून नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे येथे गर्दुल्ले, चरसींचा वावर असतो. नगारखान्यावर झाडे उगवली आहेत. त्याची तटबंदी ढासळण्याच्या स्थितीत आहे. जुना राजवाडा भग्नावस्थेत पहावयाला मिळतो. राजवाड्याची इमारत दुमजली असून तिथे काही वर्षे भारती विद्यापीठ व नगरपरिषदेच्या शिक्षण विभागाचे कार्यालय होते.

राजदरबार, उद्याने, पाण्याचा तलाव, घोड्यांच्या पागा, विहीर, भव्य पटांगण, कडेकोट भिंती आणि चारी दिशांनी असणारे बुरुज, असे वैभव या राजवाड्याचे होते. सुमारे २१ हजार चौ.मी. क्षेत्र असलेला हा जुना राजवाडा आज जव्हार नगरपरिषदेच्या ताब्यात आहे. खुले नाट्यगृह, शिक्षण मंडळाचे कार्यालय, व्यायामशाळा, क्रीडांगण, गणपती सभागृह, पाण्याचे उंच जलकुंभ, अशा नागरी सुविधांसाठी या राजवाड्याच्या इमारतींचा वापर केला जातो. ही ऐतिहासिक वास्तू असल्याने पुरातत्व खात्याकडे द्यावी, अशी मागणी जव्हारवासी करत आहेत. या परिसरातील कारागीर आणि जव्हारजवळील न्याहळे येथील कावळ्याचा बांध खाणीतील मजबूत व सुंदर दगडातून हा राजवाडा बांधण्यात आला. पुढे राजे कृष्णशहा यांनी राजवाड्याचा विस्तार करून अतिभव्य असा नगारखाना, गणपती मंदिर व अनेक खोल्यांचा विस्तार केला. आज जव्हारच्या इतिहासाताची साक्ष देणाऱ्या जव्हारमधील जुन्या राजवाड्याची अवस्था बिकट झाली आहे. जीर्णोद्धार होत नसल्याने तटबंदी व इमारत अखेरची घटका मोजत आहे.

- Advertisement -

जव्हार नगरपरिषदेने नुकतेच १०० वर्षे पूर्ण करण्याचा मान मिळवला असला तर आजही जव्हारमधील जनता विकासाची वाट पाहत आहे. गेल्या चार वर्षात शेकडो कोटी रुपये निधी उपलब्ध होऊन सुद्धा जुन्या राजवाड्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न केले जात नसल्याने जव्हारकर संताप व्यक्त करत आहेत. सत्ताधारी जरी कोट्यवधी रुपये निधी आणला, असे म्हणत असले तरी मात्र नगरपरिषदेचा कार्यकाळ संपण्यासाठी अवघे काही महिने शिल्लक आहेत. तरीही एकही विकासकाम पूर्ण झाले नाही हे वास्तव आहे. नरेश श्रीमंत यशवंतराव मुकणे राजेसाहेबांनी कृतज्ञतेच्या भावनेतून आपला ऐतिहासिक असा जुना राजवाडा, जव्हार नगरपरिषदेला भेट दिला. हल्लीचा जुना राजवाडा या परिसरात १७५० साली कृष्णा राजांनी बांधला होता. दुदैवाने अवय ७२ वर्षांनी १८२० साली तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आज त्या जागी खुले नाट्यगृह आहे. त्यानंतर १८२७ मध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या जुन्या राजवाड्याचे बांधकाम, आपला मुलगा पतंगराहा याला राजगादीवर बसवून त्यांच्या नावाने कारभार पाहणाऱ्या राणी सगुणाबाई यांनी सुरु केले.

जव्हारचे राजे कै. यशवंतराव मुकणे यांनी आपल्या मालकीच्या खुप वास्तू जव्हार नगरपरिषदेला दान स्वरूपात दिल्या. मुकणे राजांनी जव्हार नगरपरिषदेला मोफत जुना राजवाडा दान केला. मात्र जव्हार नगरपरिषदेने आजवर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती न केल्याने ही ऐतिहासिक वास्तू आज अखेरच्या घटका मोजत आहे. जव्हार नगरपरिषदेने या राजवाड्याच्या विकासासाठी आदिवासी सृष्टी तिथे निर्माण करणार असल्याचे समजते. मात्र त्याला आजपर्यंत राज्य शासनाने मान्यता दिलेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे ऐतिहासिक वास्तू असलेल्या जुन्या राजवाड्याच्या मागील बाजूस जव्हार नगरपरिषदेने डम्पिंग ग्राऊंड तयार केले आहे. ही बाब अत्यंत लज्जास्पद असून, सर्व गावाचा कचरा राजवाड्याचा परिसरात जमा केला असल्याने नाराजी व्यक्त केली जाते आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

मुस्लिमांना दुय्यम नागरिक बनवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न, नसीरुद्दीन शाहांचा मोदींवर निशाणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -