घरपालघरपालघर जिल्हा परिषदेचा आवक-जावक कक्ष बंद; नागरिकांची गैरसोय

पालघर जिल्हा परिषदेचा आवक-जावक कक्ष बंद; नागरिकांची गैरसोय

Subscribe

पालघर जिल्हा परिषद नवीन इमारतीमध्ये स्थलांतर होऊन एक वर्षही झाले नसेल. अशातच नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावा लागत आहे.

पालघर जिल्हा परिषद नवीन इमारतीमध्ये स्थलांतर होऊन एक वर्षही झाले नसेल. अशातच नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावा लागत आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्यालय इमारतीत अनेक कार्यालय कार्यान्वित झाले असले तरी तळमजल्यावर असलेले पालघर जिल्हा परिषदेचे आवक-जावक कक्ष मात्र बंद आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या आवकजावक कक्ष इतरत्र नेल्याने तो शोधताना नागरिकांची चांगली दमछाक होत आहे.

 

- Advertisement -

मनुष्यबळाची कमतरता असल्याने सद्यस्थितीत कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावरून हा कक्ष सामान्य प्रशासन विभागात कार्यरत आहे. मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर कक्ष पुन्हा सुरू करण्यात येईल.
– वैदेही वाढाण, अध्यक्षा, जिल्हा परिषद, पालघर 

 

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या प्रशस्त इमारतीमध्ये अनेक विभागांची कार्यालये कार्यरत आहेत. प्रत्येक कार्यालयात पत्रव्यवहार होत असताना तो आवक-जावक कक्षाच्या माध्यमातून होतो. मात्र काही महिने हा कक्ष देखाव्यापुरता सुरू ठेवला. त्यानंतर प्रशासनाने तो बंद केला. कक्ष बंद करण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. पत्रव्यवहाराचे हे मध्यवर्ती कक्ष कार्यालय बंद करून सामान्य प्रशासन विभागात हलवण्यात आले आहे. स्वतंत्र कक्ष असताना तो सामान्य प्रशासन विभागात का स्थलांतर केला. याचे उत्तरही सापडू शकत नाही. मात्र यामुळे आपली कामे किंवा पत्र घेऊन येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.

 

प्रवेशद्वारावर इमारतींमधील कार्यालयाची माहिती व रचना सर्वसामान्यांसाठी दर्शनी भागात लावले आहे. तरी नागरिकांना ही कार्यालये शोधण्यास अडचणी येत आहेत. त्यातच महत्त्वाचा भाग म्हणजे आवक-जावक कक्ष कुठे आहे?, हे अनेकांना विचारणा करावी लागते. याआधीच सामान्य प्रशासन विभागाचे कार्यालय एका कोपऱ्यात आहे. त्याच कार्यालयात एका बाजूला आवक-जावक टेबल ठेवण्यात आला आहे. तिथुनच पत्रे आदी स्वीकारली जातात. हे टेबलही लगेच दृष्टीस पडत नाही. जिल्हा परिषदेने आवक-जावक कक्षासाठी चार कर्मचाऱ्यांची मंजुरीही घेतली आहे. मात्र स्वतंत्र कार्यालय असतानाही ते सामान्य प्रशासन विभागात का चालवले जाते, या प्रश्नाचे उत्तर अजूनही सापडलेले नाही. आवक-जावक कक्ष सुरू करण्याची मागणी नागरिकांसह काही कर्मचाऱ्यांकडून देखील केली जात आहे.

हेही वाचा –

आरबीआयचा कर्जदारांना मोठा झटका; गृह, वाहन कर्ज महागणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -