घरपालघरस्वर्गिय बाळासाहेब ठाकरे विमा योजना कागदावरच

स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे विमा योजना कागदावरच

Subscribe

सरकारी अनास्थेमुळे अद्याप एकही रुग्णालय योजनेअंतर्गत अंगीकृत नसल्याने रस्ते अपघातग्रस्तींचे हाल, उपचारासाठी आर्थिक मदत मिळवताना दमछाक होत असल्याची तक्रार रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

राजकीय, प्रशासकीय अनास्थेमुळे स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना दुर्लक्षित राहिली आहे. सरकारी अनास्थेमुळे अद्याप एकही रुग्णालय योजनेअंतर्गत अंगीकृत नसल्याने रस्ते अपघातग्रस्तींचे हाल, उपचारासाठी आर्थिक मदत मिळवताना दमछाक होत असल्याची तक्रार रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. १६ सप्टेंबर २०२० च्या मंत्रिमंडळ बैठकीत रस्ते अपघात विमा योजने बाबत चर्चा होऊन स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने १४ ऑक्टोबर २०२० रोजी योजनेची अंमलबजवाणी देखील झाल्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. रस्ते अपघातातील जखमींना वेळेवर उपचार मिळून मृत्यू दर तसेच अपंगत्वाचे प्रमाण कमी होईल हा प्रामाणिक उद्देश सरकारचा होता. त्यामुळे या योजनेची घोषणा झाल्यानंतर सरकारचे सर्व स्तरातून कौतुक देखील झाले.

परंतु या योजनेला मंजुरी मिळून तब्बल १ वर्ष होऊन गेले तरी अद्याप एकही रुग्णालय या योजनेअंतर्गत अंगीकृत नसल्याचे आढळून आले आहे. याबाबतीत रुग्णमित्र राजेंद्र ढगे गेली एक वर्ष सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांपासून ते नेत्यांपर्यंत या रस्ते अपघात विमाबाबत चर्चा केली. पण कुणालाही या योजनेचे सोयर सुतक नसल्याचे आढळून आल्याची खंत ढगे यांनी व्यक्त केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना याबाबत विचारणा केली असता अजून कालावधी जाईल, हेच उत्तर मिळते. जर योजनेला अवधी लागणार असेल तर तसे स्पष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सरकारचे आहे. १४ ऑक्टोबर २०२० ला शासन निर्णय जाहीर करून नागरिकांची वाहवा घ्यायचा अट्टाहास का केला?. नागरिकांची दिशाभूल करून बाळासाहेबांच्या नावाने सरकार फसवणूक करत असल्याची खंत रुग्णमित्र ढगे यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शक्तीस्थळावर जाऊन पोस्टरद्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न ढगे यांनी केला होता. आता बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंती दिनानिमित्त शिवसेना भवन येथे जाऊन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न ढगे यांनी केला आहे. किमान आता तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यात जातीने लक्ष देऊन ही योजना कार्यान्वित करून स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचा प्रचार प्रसार जनजागृती करतील, अशी अपेक्षा ढगे यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा –

भाजप युती करुन खच्चीकरण करतो हे शिवसेनेला कळल होतं, नवाब मलिकांचे वक्तव्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -