घरपालघरआधीच उल्हास त्यात फाल्गुन मास

आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास

Subscribe

त्यामुळे रात्रीच्या सुमारास येथून प्रवास करणार्‍या वाहन चालकांचा धोकादायक प्रवास सुरू असल्याचे वाहन चालकांनी सांगितले.

वसईः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महामार्ग प्राधिकरणाकडून लावण्यात आलेल्या पथदिव्यांचे वीज बिल न भरल्याने अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत. रात्रीच्या सुमारास महामार्गावरून प्रवास करणार्‍या वाहनचालकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. वसई पूर्वेतील भागातून हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या मार्गावरून दररोज मुंबई व गुजरातच्या दिशेने जाणार्‍या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रात्रीच्या सुमारास वाहन चालकांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी अनेक ठिकाणी पथदिवे लावण्यात आले होते. मात्र प्राधिकरणामार्फत या पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती योग्यरीत्या केली जात नाही. घोडबंदर ते शिरसाड फाटा या दरम्यान असलेल्या अनेक ठिकाणी पथदिवे बंद असतात. तर काही ठिकाणच्या विद्युत दिवे फुटून गेले आहेत. त्यामुळे रात्रीच्या सुमारास येथून प्रवास करणार्‍या वाहन चालकांचा धोकादायक प्रवास सुरू असल्याचे वाहन चालकांनी सांगितले.

आता विविध ठिकाणी खड्डेही पडले आहेत. अंधार असल्याने खड्डे दिसून येत नसल्यानेही अपघाताचा धोका संभवतो. विशेषत: या पथदिव्यांसाठी वापरण्यात येणार्‍या विजेचे देयके भरले नसल्याने या महामार्गावरील पथदिवे बंद असल्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी वसईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उघड झाले होते. पथदिव्याअभावी रात्रीच्या सुमारास होणार्‍या वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा छोट्या- मोठ्या अपघाताच्या घटनाही घडतात. यासाठी महामार्गावरील समस्या प्राधिकरणाने लवकरात सोडवाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून वेळोवेळी आढावा घेण्यात येत असल्याचे गावित यांनी सांगितले आहे. येत्या १५ दिवसांत या सर्व समस्या सोडवण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. वसई पूर्वेच्या भागातून गेलेल्या महामार्गावर तयार करण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या खालील मार्गात पथदिवे लावण्यात आले नाहीत. यात चिंचोटी, मालजीपाडा, नायगाव, ससूनवघर यासह इतर ठिकाणचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -