घरपालघरवाडा पश्चिमेकडील भागातील नाणे गाव "नॉट रिचेबल"...

वाडा पश्चिमेकडील भागातील नाणे गाव “नॉट रिचेबल”…

Subscribe

वर्क फ्रॉम होम करणार्‍या कर्मचार्‍यांना बसत असून आमचे गाव मोबाईल कंपन्यांच्या रेंजमध्ये कधी येणार, असा सवाल येथील ग्रामस्थांनी विचारला आहे.

वाडा : दहा हजाराहून अधिक लोकसंख्या असणार्‍या वाडा तालुक्यातील पश्चिमेकडील नाणे गावासह अन्य गावात कोणत्याही मोबाईल कंपनीची रेंजच येत नसल्याने गावकरी हवालदिल झाले आहेत. याचा सर्वाधिक फटका ऑनलाइन शिक्षण घेणार्‍या तसेच ऑनलाइन परीक्षा देणारे विद्यार्थी व वर्क फ्रॉम होम करणार्‍या कर्मचार्‍यांना बसत असून आमचे गाव मोबाईल कंपन्यांच्या रेंजमध्ये कधी येणार, असा सवाल येथील ग्रामस्थांनी विचारला आहे.

वाडा पश्चिमेकडील नाणे हे गाव कोहोज किल्ल्याच्या पायथ्याशी व वैतरणा नदीच्यातीराव आहे. परिसरातील गावांची लोकसंख्या जवळपास अंदाजे दहा हजाराच्या वर आहे. या गावातील शेकडो चाकरमानी पोटापाण्यासाठी वाडा, पालघर, वसई तसेच बोईसर येथे कामानिमित्त जात असतात. गावात कोणत्याही मोबाईल कंपनीची रेंज मिळत नसल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. या सर्वांना आपले लॅपटॉप उचलून त्यांना काम करण्यासाठी गावाबाहेर जावे लागते. रात्री-अपरात्री एखादी दुर्घटना घडल्यास अथवा कुणाला निरोप द्यायचा असल्यास कोणालाही संपर्क करता येत नाही. या गावाच्या आसपास असणार्‍या नाणे, सांगे, गालतरे या गावात चांगली रेंज मिळते. मात्र नाणे गावातच रेंज नसल्याने हे गाव “नॉट रिचेबल” झाले आहे. त्याच बरोबर तलाठी सजा ही अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे गावातील शेतकरी यांना अन्य गावात शेतीच्या व सातबारे उतारे काढण्यासाठी जावे लागते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -