विरार : मागील काही वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले पासपोर्ट कार्यालय अखेर वसईतील एव्हरशाईन येथे सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी केंद्रीय परराष्ट्र आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रादेशिक पारपत्र अधिकारी मुंबई डॉ.राजेश गवांडे, नवी मुंबई टपाल विभाग अधिकारी सुश्री सरन्या, पोलीस सहआयुक्त श्रीकांत पाठक, प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार उज्वला भगत यासह इतर मान्यवर उपस्थित होते.वसई- विरारसह पालघर जिल्ह्यातील नागरिक विदेशात फिरण्यासाठी, व्यवसायासाठी, शिक्षणासाठी जात असतात. त्यासाठी पासपोर्टची गरज भासते. परंतु, शहरात पासपोर्ट काढण्याची कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याने ठाणे व मालाड येथे जावे लागत होते. जानेवारी २०२२ मध्ये वसई पूर्वेच्या एव्हरशाईन सिटी येथील टपाल कार्यालयात या पासपोर्ट कार्यालयाच्या निर्मितीचे काम सुरू करून ते पूर्ण झाले आहे.
वसईत अखेर पासपोर्ट कार्यालय सुरू
written By My Mahanagar Team
vasai
जानेवारी २०२२ मध्ये वसई पूर्वेच्या एव्हरशाईन सिटी येथील टपाल कार्यालयात या पासपोर्ट कार्यालयाच्या निर्मितीचे काम सुरू करून ते पूर्ण झाले आहे.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -