घरपालघरउष्माघाताच्या बळीत पालघरमधील दोघे

उष्माघाताच्या बळीत पालघरमधील दोघे

Subscribe

तर दुसरीकडे जव्हार येथील जांभूळविहीर परिसरात राहणारे तुळशीराम भाऊ वांगड (वय वर्ष ५८) यांचे निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत.

वसईः नवी मुंबईतील खारघर येथील मैदानात महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे बळी पडलेल्यांमध्ये पालघरमधील दोघांचा समावेश आहे. विरारजवळील भामटपाडा येथील एका तरुणाचा समावेश असल्याने गावात शोककळा पसरली आहे. स्वप्निल सदाशिव किणी (३०) असे त्या तरुणाचे नाव आहे. वसई तालुक्यात ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे हजारो अनुयायी आहेत. तर दुसरीकडे जव्हार येथील जांभूळविहीर परिसरात राहणारे तुळशीराम भाऊ वांगड (वय वर्ष ५८) यांचे निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत.

या घटनेने संपूर्ण तालुक्यात तसेच श्री सदस्यांत शोक कळा पसरली आहे, ही दुःखद घटना समजताच पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार जव्हार पोलीस ठाणे यांच्या जनसंवाद अभियानांतर्गत दुःखी कुटुंबाचे सांत्वन करून दुःखामध्ये समस्त पालघर पोलीस दल व जव्हार पोलीस ठाणे सहभागी आहोत व कोणतीही मदत लागल्यास मदत देण्यास जव्हार पोलीस ठाणे कटिबद्ध असल्याचा विश्वास पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -