२००८ मध्ये सुरु झालेली आणि सर्वांच्या मनात घर केलेली 'बालिका वधू' मालिका चांगलीच गाजली. ही मालिका आता पुन्हा एकदा १२ वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. लॉकडाऊनमुळे सध्या सुरु असलेल्या मालिकांचे शूटींग बंद असल्यामुळे जुन्या गाजलेल्या मालिका पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये आता 'बालिका वधू' मालिका देखील सुरु झाली आहे. दरम्यान, या मालिकेतील सर्वांचीच लाडकी आनंदी म्हणजेच अविका गौरचा १२ वर्षानंतरचा ग्लॅमरस लूक पाहुन तुम्हीही अवाक व्हाल. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)