लोकसभा निवडणुकीत ५४२ पैकी ५४२ मतदारसंघाचे कौल समोर आले असून भाजपाप्रणित एनडीए ३४७ जागांवर आघाडीवर आहे. देशातील जनतेने मोदी सरकारच्या बाजूने कौल दिल्याचे दिसत आहे. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि केरळमधील वायनाड या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यातील अमेठीत राहुल गांधी हे पिछाडीवर असून त्यांना सध्या सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. (सौजन्य : सोशल मीडिया)