उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात मंगळवारी मध्यरात्री चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संगमाजवळ झालेल्या या चेंगराचेंगरीत 10 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून, अनेकजण जखमी झाले आहेत.
प्रयागराज : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात मंगळवारी मध्यरात्री चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संगमाजवळ झालेल्या या चेंगराचेंगरीत 10 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून, अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर सरकार आणि पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बुधवारी (ता. 29 जानेवारी) पहाटे 1 ते 2 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेनंतर या ठिकाणावरील गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलिसांचा आणखी फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. (Mahakumbh Stampede Heartbreaking photos)
प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली असून या कुंभमेळ्यात मौनी अमावस्येच्या दिवशी चेंगराचेंगरीची घटना घडली.
बुधवारी (ता. 29 जानेवारी) पहाटे 1 ते 2 वाजताच्या दरम्यान संगम घाटावर लाखोंच्या संख्येने अमृतस्नान करण्यासाठी भाविक जमा झाले.
एकाचवेळी लाखोंच्या संख्येने संगम घाटावर भाविक आल्याने या ठिकाणी अचानक पळापळ सुरू झाली, ज्यानंतर चेंगराचेंगरी झाली.
या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करत नागरिकांना घटनास्थळावरून बाहेर काढण्याचे काम सुरू केले.
चेंगराचेंगरीच्या या घटनेत 10 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत.
संगम घाटापासून काही अंतरावर घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर लोकांच्या पायातील चपला, त्यांचे कपडे अत्यावस्था पडलेले पाहायला मिळाले.
या घटनेमुळे अनेकांचे सामानही विखुरले गेले. यावेळी लोकांनी केवळ स्वतःचा जीव कसा वाचवता येईल, याचा प्रयत्न केला.
संगम घाटावर बांधण्यात आलेल्या पुलांवर सुद्धा नागरिकांची मोठी गर्दी झाली, ज्यानंतर नागरिकांनी आपल्या लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.
मौनी अमावस्येनिमित्त लाखोंच्या संख्येने संगम घाटावर गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीच्या घटनेतील लोकांना वाचविण्यासाठी आलेली पोलिसांची गाडी देखील या गर्दीत अडकली.
चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर अनेक आखाड्यांनी अमृतस्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला. तर जगभरातून आलेल्या भाविकांना अमृतस्नान करता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.