मुंबई : यसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC ODI World Cup 2023) स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. विश्वचषकाचा विजेता रविवारी म्हणजेच 19 नोव्हेंबरला जगाला मिळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या अहमदाबादच्या (Ahmadabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय संघाने तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकावा यासाठी देशभरातून होम हवन करण्यात येत आहे. भाजपचे अतुल शाह यांनीही मुंबईत भारतीय संघासाठी होमहवन आयोजित केले होते.
भारतीय क्रिकेट चाहत्यांसह भाजपचे अतुल शाह यांनी मुंबईत होमहवन आयोजित केले होते.
मुंबईतील माधवबाग मंदिर, सीपी टँक येथे अतुल शाह यांनी भारतीय संघाने विश्वचषक जिंकावा यासाठी विशेष प्रार्थना केली.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकासाठी अंतिम सामना होणार आहे.
भारतीय संघाने आतापर्यंत 1983 आणि 2011 अशा दोन वेळा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. त्यामुळे आता तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याची भारतीय संघाला संधी आहे.
ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत 5 वेळा विश्वचषकावर नाव कोरले आहे. परंतु भारतीय संघाला 20 वर्षांपूर्वी म्हणजेच 2003 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची उद्या संधी असणार आहे.