नुकतेच राज्यभरात गणपती विसर्जन मोठ्या जल्लोषात पार पडला. यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशी निघालेल्या लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक ही तब्बल 23 तासांनंतर म्हणजेच दुसऱ्या दिवशी झाली. पण मुंबईतील अंधेरीच्या राजाचे आज विसर्जन हे संकष्टी चतुर्थीला झाले आहे.
- Advertisement -
आपल्या लाडक्या बाप्पाल निरोप देण्यासाठी अनेक गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
- Advertisement -
गणेश भक्तांनी मोठ्या तोढ-ताशाच्या गजरात अंधेरीच्या राजाला गणपती बप्पा मोरया जयघोषात निरोप दिला. अंधेरीच्या राजाचे विसर्जन हे वर्सोवा येथे समुद्रात करण्यात आले.
अंधेरीचा राजा हा नवसाला गणपती पावणारा अशी ख्याती आहे.
यंदाच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर अंधेरीच्या राजाचा शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिकृती उभारली आहे.