आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि तरुण खासदार राघव चढ्ढा हेसुद्धा होते. या तिघांनीही आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज या दोन पक्षांची झालेली गाठभेट फार महत्त्वाची मानली जातेय. वंचित बहुजन आघाडीने नुकतेच ठाकरे गटासोबत युती केली आहे. त्यानंतर, आपच्या नेत्यांची उद्धव ठाकरेंनी भेट घेतल्याने यांचीही पक्षीय समिकरणे जुळून येतात का हे पाहावं लागणार आहे.
सर्व फोटो- दीपक साळवी
आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आज मुंबई दौऱ्यावर आले होते.
त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही होते.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय.
यावेळी आपच्या नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
केंद्र सरकार काही उद्योगपतींचा फायदा होण्यासाठी देश गहाण ठेवत आहे. देशातील सर्व संस्थानांची विक्री करत आहे’, अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
. या भेटीदरम्यान, देशातील अनेक समस्यांवर चर्चा केल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. तसेच, देशभरात वाढलेल्या महागाईवरही चर्चा करण्यात आली.
यावेळी पंजाबचे सर्वांत तरुण खासदार राघव चड्ढाही उपस्थित होते.
आपण एकमेकांकडून काही शिकू, तेव्हाच आपला देश पुढे जाईल. आपल्याला एकमेकांसोबत लढायचे नाहीये, तर शिकायचे आहे”, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले.