सध्या विश्वचषकात भारताने ५ सामन्यांपैकी चार सामने जिंकले आहेत. भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. मात्र या सामान्याआधीच भारतात राजकीय वातावरण तापले आहे. भारतीय संघ ३० जूनला इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भगव्या रंगाची जर्सी घालून खेळणार आहे. या भगव्या रंगामुळे राजकीय वातावरण तापले आहे. अल्पसंख्याक आमदारांनी या जर्सीबाबत नाराजी व्यक्त केलीय. तर सत्ताधारी आमदारांनी राष्ट्रीय ध्वजातल्या भगव्या रंगावर नाराजी कसली? हा प्रश्न उपस्थित केला आहे. एकूणच भगव्या रंगाच्या जर्सीमुळे राजकीय सामना रंगला आहे.