राज्याच्या सत्तासंर्षाच्या निकालाच वाचन सर्वोच्च न्यायालयात सुरु झाले आहे. निकालाच्या सुरुवातीलाच घटनापीठाने सत्तासंघर्षाचे हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवले आहे. तसेच, 10 प्रश्न तयार करुन हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवले जाणार आहे.
आतापर्यंत आलेल्या निकालानुसार, अपात्रतेची कारवाई सुरु असताना कोणीही मीच खरी शिवसेना असा दावा करु शकत नाही, असं म्हणत न्यायालयाने शिंदे गटाला सुनावलं आहे. न्यायालयानं शिंदेंना झटका दिला आहे. राज्यपाल, प्रतोद आणि व्हिप या मुद्द्यांवरुन शिंदे गटाला सुनावलं आहे. राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय हे चुकीचं असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. राज्यपालांनी कोणत्याही एका पक्षाला पाठिंबा देणं हे चुकीचं आहे, असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. तसंच, प्रतोद नियुक्तीत राज्यपालांनी हस्तक्षेप करु नये. ( Maharashra Politics Crisis Shock for Shinde It cannot claim that this is the real Shiv Sena the Supreme court heard )